नवी दिल्ली | भारतातील लोकांनी नरेंद्र मोदींना हरवलं पाहिजे. काश्मीर, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि ढासळती अर्थव्यवस्था यावर देश-विदेशातून सुरु असणाऱ्या प्रतिक्रियेंमुळे नरेंद्र मोदींचे मानसिक संतुलन बिघडलं असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसैन यांनी केलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.
दिल्ली विधानसभेत हरण्याची भीती असल्याने त्यांच्याकडून दबावाखाली अनेक अजब दावे करण्यात येत आहेत. मोदी लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करत असल्याचंही फवाद हुसैन यांनी म्हटलं आहे.
भारताचं सैन्य पाकिस्तानला 7 ते 10 दिवसात हरवू शकतं. एनसीसीच्या कार्यक्रमात मोदींनी हे भाष्य केलं होतं. शेजारील देश तीनदा युद्धात पराभूत झालेला आहे. लोक छुपं युद्ध लढत आहेत. त्या शेजारील देशाचा पराभव करण्यासाठी 10 दिवससुद्धा लागणार नाहीत, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.
दरम्यान, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ‘आप’ला पराभूत करण्यासाठी दिल्लीत भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
People of India must defeat #Modimadness ,Under pressure to lose another State Elections(Delhi on Feb 8th),he resorts to ridiculous claims and threats endangering Region,Mr Modi has lost balance after internal and external reaction to Kashmir,Citizenship laws and failing economy https://t.co/bBIyOvf5Ee
— Ch Fawad Hussain (@fawadchaudhry) January 30, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“राजेंद्र आज असा नटलाय, लग्नात सुद्धा इतका नटला नव्हता”
पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय?; प्रेमी युगलाला मारहाण करत तरूणीचा विनयभंग
महत्वाच्या बातम्या-
तुम्ही अॅक्सिडंटल मुख्यमंत्री आहात का? संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणतात…
महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा उभारणार- देवेंद्र फडणवीस
100 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केला होता ‘मूकनायक’!
Comments are closed.