मुंबई | हाथरसमधील घडलेल्या घटनेमुळे देशातुन संताप व्यक्त होत असताना बलात्कार थांबवण्यासाठी मुलींवर संस्कार करणं गरजेचं असल्याचं भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या वक्तव्यावरून निशाणा साधला आहे.
एकीकडं आपल्या महान भारतीय संस्कृतीचा गौरव जगभरात होत असताना अशा लोकप्रतिनिधींकडून तोडल्या जाणाऱ्या ताऱ्यांमुळं त्यांच्यावरील संस्कारांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होतं, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, सुरेंद्र सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय नेत्यांनी टीके केली.
‘मुलींवर चांगले संस्कार केले तर बलात्कार होणार नाहीत’, असं बेताल वक्तव्य UP तील भाजपच्या एका आमदार महाशयांनी केलं. एकीकडं आपल्या महान भारतीय संस्कृतीचा गौरव जगभरात होत असताना अशा लोकप्रतिनिधींकडून तोडल्या जाणाऱ्या ताऱ्यांमुळं त्यांच्यावरील संस्कारांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होतं.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 5, 2020
महत्वाच्या बातम्या-
मोठ्या मनाचा माणूस; सोनू सूद रिक्षा ड्रायव्हरला मिळवून देणार नवा हात
…म्हणून मी कपिल शर्माच्या शोमध्ये जात नाही- मुकेश खन्ना
धनगर आरक्षणासाठी 16 ऑक्टोबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन
आजवर तुम्ही आमचं रक्त प्यायलात, आता…- गोपीचंद पडळकर