अखेर रेखा बोलली; सिंदूर लावण्यामागचं सांगितलं कारण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुबंई | 1969 साली ‘अंजाना सफर’ या चित्रपटातून अभिनेत्री रेखाने (Rekha) चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. आज 66 व्या वर्षीदेखील रेखा तितकीच सुंदर आहे. आजही अनेक अभिनेत्री रेखाच्या सौंदर्यापुढे फिक्या पडतात. रेखाच्या काळातील लोकच नव्हे तर प्रचंड तरुण वर्गदेखील रेखाचा चाहता आहे.

बाॅलिवूडपासून (Bollywood) रेखा सध्या दूर आहे. रेखा नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अनेकदा तिच्या आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या अफेअरच्या चर्चा केल्या जातात. याविषयी मात्र रेखा किंवा अमिताभ बच्चन दोघांनीही कोणतंही भाष्य अजूनपर्यंत केलं नाही.

यानंतर रेखानं उद्योगपती मुकेश अग्रवाल (Mukesh Aggarwal) यांच्याशी लग्न केलं होतं. रेखाचं हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या 3 महिन्यानंतरच रेखा आणि मुकेश यांचा घटस्फोट झाला होता. यानंतर मुकेश अग्रवालने गळफास घेत आत्महत्या केली होती. पतीच्या निधनानंतर देखील रेखानं भांगेत सिंदून भरणं काही सोडलं नाही. यामुळे तिच्या चाहत्यांना आणि इतरांनादेखील हा प्रश्न नेहमीच पडतो की रेखा कोणाच्या नावाचं सिंदूर भरते.

रेखा कोणाच्या नावाचं सिंदूर भरते याचं उत्तर खुद्द रेखानेच दिलं आहे. ती ज्या भागातून किंवा ज्या प्रदेशातून आली आहे तेथे सिंदूर हे फॅशनसाठी लावलं जातं. त्याठिकाणी सिंदूर हे सौभाग्याचं प्रतिक नाही. सिंदूर लावल्यानंतर मी आणखीन सुंदर दिसते. माझ्या सौदर्यांत आणखी भर पडते असं मला वाटत असल्यानं मी सिंदूर लावते, असा खुलासा रेखानं केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या