Operation Sindoor | पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याला १६ दिवसांनी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) द्वारे सडेतोड प्रत्युत्तर दिले. भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर अचूक मिसाईल हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. या कारवाईत लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांच्या नेतृत्वाखाली ही योजना आखण्यात आली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) स्वतः या ऑपरेशनवर लक्ष ठेवून होते.
पहलगामचा बदला, अजित डोवाल यांची रणनीती
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये (Pahalgam) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय आणि एका नेपाळी पर्यटकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. दहशतवाद्यांनी धर्म विचारून, खतना तपासून आणि ‘मोदींना सांगा’ असे म्हणत हे अमानुष कृत्य केले होते. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होत होती. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली ‘ऑपरेशन सिंदूर’ची (Operation Sindoor) आखणी करण्यात आली.
अजित डोवाल यांच्या विशेष टीमने अत्यंत गुप्तपणे पाकिस्तानमधील (Pakistan) लष्करी आणि दहशतवादी हालचालींची माहिती गोळा केली. नॅशनल टेक्नॉलॉजी रिसर्च ऑर्गनायझेशनने (NTRO – National Technology Research Organization) यात महत्त्वाची भूमिका बजावली. दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे, त्यांच्या फॅक्टरी आणि लपण्याच्या ठिकाणांची (लाँच पॅड्स) ओळख पटवण्यात आली. लक्ष्य निश्चित झाल्यावर अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना योजनेची माहिती दिली आणि केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याचे ठरले.
‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी
पंतप्रधान मोदींनी (PM Modi) हिरवा कंदील दाखवल्यानंतर, अजित डोवाल यांनी आपल्या टीमसोबत अंतिम योजना आखली. एक कंट्रोल रूम (Control Room) स्थापन करण्यात आली, जिथून डोवाल स्वतः ऑपरेशनवर देखरेख करत होते आणि पंतप्रधान मोदींना वेळोवेळी माहिती देत होते. भारतीय हवाई दलाने ६ मे रोजी मध्यरात्री १ वाजून २८ मिनिटांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ला सुरुवात केली आणि १ वाजून ५१ मिनिटांनी, म्हणजेच अवघ्या २३ मिनिटांत मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली.
राफेल (Rafale) आणि सुखोई (Sukhoi) यांसारख्या लढाऊ विमानांनी स्काल्प (SCALP) क्षेपणास्त्रांचा वापर करत पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) ९ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. या तळांमध्ये बहावलपूर (Bahawalpur) (आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी आत, जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय), मुरीदके (Muridke) (सीमेपासून ३० किमी आत, लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय), सवाई (Sawai) (लष्कर-ए-तैयबाचा अड्डा, सीमेपासून ३० किमी दूर), गुलपूर (Gulpur) (दहशतवाद्यांचा अड्डा, ताबारेषेपासून ३५ किमी दूर, हल्ल्यावेळी ८० दहशतवादी उपस्थित), बिलाल (Bilal) (जैश-ए-मोहम्मदचे हवाई तळ, सीमेपासून ३५ किमी दूर), कोटली (Kotli), बरनाला (Barnala), सरजाल (Sarjal) आणि महमूना (Mahmuna) (हिजबुल्लाचे प्रशिक्षण केंद्र, सीमेपासून १५ किमी दूर) यांचा समावेश होता.
संरक्षण मंत्रालयाचे निवेदन
या ऑपरेशनची अनेक वैशिष्ट्ये होती. पाकिस्तानच्या (Pakistan) रडार यंत्रणेला चकवून हा हल्ला करण्यात आला. भारताने (India) केवळ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याची कबुली पाकिस्ताननेही (Pakistan) दिल्याचे वृत्त आहे. पाकव्याप्त काश्मीरच नव्हे, तर पाकिस्तानच्या (Pakistan) भूमीतील अड्डेही लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात एकाही पाकिस्तानी नागरिकाला किंवा लष्करी ठिकाणाला इजा पोहोचली नाही, असे संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) स्पष्ट केले.
संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) म्हटले की, “आमची कारवाई केंद्रित, स्पष्ट आणि कोणताही वाद निर्माण करण्यापासून दूर होती. भारताने (India) ठिकाणांची निवड आणि ती उद्ध्वस्त करण्यात खूप संयम दाखवला आहे. पहलगाम हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना उत्तर दिले जाईल, ही आमची कटिबद्धता होती.” ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव स्वतः पंतप्रधान मोदींनी सुचवले होते, जे शहीद लेफ्टनंट विनय नरवाल (Lt. Vinay Narwal) यांच्या पत्नी हिमांशी नरवाल (Himanshi Narwal) यांच्या सिंदूरचा सन्मान म्हणून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते.