मुबंई | एकीकडे 12 खासदार आणि 40 आमदार शिंदे गटासोबत गेले आहेत. शिवसेनेची गळती चालूच आहेत. यातच शिवसेनेचे(Shivsena) महत्वाचे समजले जाणारे दोन नेते अर्थात संजय राऊत आणि अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. याबाबत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी एक मोठं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
सहा-सात महिन्यातील दिवस पाहिल्यास अनेकवेळा अनिल परब आणि संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली आहे. अनिल परब (Anil parab) यांनी दिलेली उत्तरे अजिबात समाधानकारक नाहीत. त्यामुळे अनेकवेळा त्यांना पुुन्हा-पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. संजय राऊतांनाही अनेकवेळा बोलावण्यात आलं आहे. संजय पांडे यांच्यानंतर आता अनिल परब आणि संजय राऊतांच्या अटकेचा नक्की नंंबर लागणार आहे, असं वक्तव्य त्यांनी पत्रकांराशी बोलताना केलं.
ईडी ही संस्था संविधानावर चालते. संविधानाचा ती आदर करते. जेव्ह ईडी (ED) कोणावर कारवाई करते तेव्हा ती साक्षीनिशी, पुराव्यानिशी करते. पुराव्याशिवाय ईडी कोणतीही कारवाई करत नाही. खोट्याला सजा देते आणि खऱ्याला न्याय देते, असंही ईडीविषयी बोलताना त्या म्हणाल्यात.
नवनीत राणांच्या या वक्तव्याला मुंबईच्या महापौर (Mayor) किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नवनीत राणा फार छान भविष्यवाणी करतात. शिवसेनेचे जे दोन वाघ आहेत ते सगळ्या गोष्टी निभावून नेतील. ही बाजू न्यायिक असल्याने त्यांनी जास्त बोलणार नसल्याचं सांगितलं. अशा प्रकरणात दिल्ली कधीही गल्ली बघत नव्हती. मात्र आता दिल्ली गल्लीतही बघायला लागली आहे, असा टोला पेडणकरांनी नवनीत राणांना लगावला आहे.
थोडक्यात बातम्या
शिवसेनेचा प्रमुख कोण?; रावसाहेब दानवे स्पष्टच बोलले
मोठी बातमी! रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष
कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर
शिवसेना आमचीच म्हणत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का
मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 1 ऑगस्टला
Comments are closed.