महाकुंभमधील 95 वर्षीय अघोरी बाबाची धक्कादायक भविष्यवाणी, म्हणाले ‘येणारा काळ हा’

Mahakumbh

Mahakumbh l प्रयागराज (Prayagraj) महाकुंभच्या (Mahakumbh) मैदानात एका अघोरी साधूने येणाऱ्या काळाबद्दल अनेक भाकिते वर्तवली आहेत. ९५ वर्षीय बाबा कालपुरुष हे त्यांच्या कठोर तपसाधना (Penance) आणि अचूक भविष्यवाणीसाठी ओळखले जातात. त्यांनी वर्तवलेल्या भविष्यानुसार येणारा काळ हा प्रलयाचा असून, नद्या आपला मार्ग बदलतील, अनेक मंदिरे पृथ्वीवर परत येतील आणि वाळवंटात (Desert) कुंभ भरवले जाईल.

संध्याकाळ होताच बाबा कालपुरुष आपल्या पायावर पाय ठेवून बैठक मारून बसतात. त्यांच्या हातात मानवी कवटी (Human Skull) असते, जी त्यांचे पाणी पिण्याचे पात्र आहे. चिता (Pyre) भडकत असते. हिमालयात (Himalaya) केलेल्या ध्यान धारणेमुळे (Meditation) त्यांचा आवाज भारदस्त झालेला आहे. आपल्या खर्जातील आवाजात ते सांगतात, “मनुष्य जे विसरलाय ते सर्व नदी (River) लक्षात ठेवते. जेव्हा गंगा (Ganga) रडेल, तेव्हा तिचे अश्रू (Tears) मैदानात येतील.”

Mahakumbh l सात महाकुंभांचा अनुभव आणि वेगळे संकेत :

बाबा कालपुरुष हे आत्तापर्यंत सात महाकुंभांना उपस्थित राहिले आहेत. ते म्हणतात, “मी गेल्या सात महाकुंभात (Mahakumbh) आलो आहे. प्रत्येकवेळी मी या मैदानात फिरलो आहे. पण यावेळचे संकेत (Signs) वेगळे आहेत. अग्निसंस्काराच्या (Cremation) ठिकाणी कावळे वेगळेच गीत गात आहेत. मृतक (Deceased) अधिक बैचेन (Restless) आहेत.”

अमावस्येच्या (New Moon) रात्री करण्यात आलेल्या त्यांच्या भविष्यवाणी येणाऱ्या काळातील भयावह चित्र (Frightening Picture) दाखवतात. त्यांची भविष्यवाणी अचूक, स्पष्ट आणि थेट असते. बाबा कालपुरुष म्हणतात, “पृथ्वी (Earth) श्वास (Breath) बदलत आहे. जेव्हा नद्या आपला मार्ग बदलेल, तेव्हा उधार घेतलेल्या जमिनीवर आपण वास्तव्य करत होतो हे शहरांच्या (Cities) लक्षात येईल. मनुष्य ज्याला स्थायी किंवा चिरंतन (Eternal) म्हणतो त्याला येणारे चार वर्ष आकार देईल.”

कावळ्यांच्या वागणुकीवरून अंदाज :

डॉ. राजेंद्र प्रसाद (Dr. Rajendra Prasad) हे एक सांस्कृतिक मनोवैज्ञानिक (Cultural Psychologist) आहेत. त्यांनी दोन दशके अघोरी परंपरांचा (Aghori Traditions) अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, अघोरींची भविष्यवाणी ही पर्यावरणाचे (Environment) निरीक्षण (Observation) आणि आध्यात्मिक अंतर्दृष्टीचे (Spiritual Insight) मिश्रण आहे. १९४३ मध्ये एका अघोरी बाबाने स्मशानभूमीतील (Crematorium) कावळ्यांच्या वागण्यावरून बंगालमध्ये (Bengal) दुष्काळ (Drought) होण्याची भविष्यवाणी वर्तवली होती आणि ती खरी ठरली होती. बाबा कालपुरुषांच्या अनेक भविष्यवाणी पाण्यावर (Water) आधारित आहेत. पाण्याची कमतरता (Scarcity) आणि प्रकोप (Outburst) यावर आधारित आहेत. “डोंगर (Mountains) आपला बर्फ (Ice) सोडून देतील. आधी हळूहळू, नंतर एकत्रपणे. पवित्र नद्या (Holy Rivers) नवे मार्ग शोधतील. अनेक मंदिरे पृथ्वीवर परत येतील,” अशी भविष्यवाणी त्यांनी वर्तवली आहे. मात्र, त्यांच्या सर्व भविष्यवाणीत विनाश (Destruction) नसतो. ते अस्खलित इंग्रजीतून (Fluent English) भविष्यवाणी वर्तवतात. “मधली पिढी (Middle Generation) काय विसरली हे तरुण पिढी (Young Generation) लक्षात ठेवेल. ही तरुण पिढी पुन्हा आकाश (Sky) वाचायला शिकेल,” असेही ते म्हणतात.

कुंभ स्थळ बदलणार? :

बाबा कालपुरुषांची सर्वात महत्त्वाची भविष्यवाणी महाकुंभशी संबंधित आहे. ते म्हणतात, “हा समागम (Confluence) बदलेल. नदी वाहत आहे. काळानुसार संगमाला (Sangam) नवीन जागा मिळेल. ज्या ठिकाणी वाळवंट आहे, तिथेच येणारी पिढी कुंभचे आयोजन करेल.”

“पुढचा बदल जगात होणार नाही, तर मनुष्य पुन्हा कसा बघायला शिकतो त्यात होईल. जुन्या शक्ती (Old Powers) परत येत आहेत. आपण काय विसरलो हे आता जन्मलेली मुले (Children) स्मरणात ठेवतील. ते हवेला (Air) समजून घेतील. पृथ्वी कधी हलणार आहे हे त्यांना कळेल. जुनी बुद्धी (Old Wisdom) मरत नाहीये, फक्त हात बदलत आहेत,” अशीही भविष्यवाणी त्यांनी केली आहे.

Title : Aghori Baba Kalpurush predicts a time of upheaval

महत्वाच्या बातम्या- 

कसं असेल आजचं हवामान?, IMD ने दिली महत्त्वाची अपडेट

इंटरनेटवर टाइमपास करणाऱ्यांची आकडेवारी समोर, बघून तुम्हालाही धक्का बसेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर जाणार!

जेल की बेल?, वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

टीव्ही इंडस्ट्रीमधून धक्कादायक बातमी, 23 वर्षाच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू

 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .