Aishwarya Rai | बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने 90 च्या दशकात तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. आज देखील ऐश्वर्या रायच्या चित्रपटांची चर्चा होत असते. ऐश्वर्या तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि सलमान खान यांच्या ब्रेकअपच्या चर्चां रंगल्यात. ऐश्वर्या आणि सलमान खान यांचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र काही कारणांमुळे या दोघांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला. दरम्यान मुलाखतीमध्ये बोलत सलमानबाबत ऐश्वर्याने एक खुलासा केला होता.
काय म्हणाली ऐश्वर्या?
एका मुलाखतीमध्ये बोलत असताना तू सलमानसोबत ब्रेकअप का केलं? असा प्रश्न ऐश्वर्याला (Aishwarya Rai) विचारण्यात आला. यावेळी ऐश्वर्या म्हणाली की, सलमान दारु पीऊन धिंगाणा घालायचा. एवढंच नाही तर, तो शिवीगाळ देखील करायचा. त्यांनी माझ्यावर शारीरिक, शाब्दिक आणि मानसिक आत्याचार केला असं देखील ऐश्वर्या म्हणाली होती. त्यामुळे मी त्याच्यासोबत ब्रेकअप केलं आणि अभिषेकसोबत लग्नबंधनात अडकले.
View this post on Instagram
शारीरिक दुखापत केली-
पुढे ऐश्वर्या (Aishwarya Rai) म्हणाली की सलमानसोबत रिलेशनमध्ये असतान, मी कामावर असं जायचे जसं काही घडलंच नाही. जेव्हा मी सलमान खानचे फोन उचलण्याचं बंद केलं तेव्हा सलमानने मला मारहाण करायला सुरुवात केली आणि शारीरिक दुखापत केली. आणि म्हणूनच मी कोणत्याही स्वाभिमानी स्त्री प्रमाणे त्याच्यासोबतचे सगळे संबध तोडलं. आमचं नातं याचमुळे तुटलं, असं तिने सांगितलं.
त्यावर सलमान खानने देखील एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली. सलमान म्हणाला की,”जर मी खरंच ऐश्वर्याला मारलं असतं तर ती वाचलीच नसती. पुढे तो असंही म्हणाला की, आता त्या बाईने सांगितलंच असं तर मी काय सांगू?”
News Title : aishwarya rai reveals about salman khan
महत्त्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुनील माने यांना मोठी जबाबदारी!
‘अजित पवारांची दादागिरी’; ‘त्या’ व्हिडीओने राजकीय वर्तुळात खळबळ
लाडकी बहिण आणि शेतकऱ्यांसाठी सरकारकडून सर्वात मोठी घोषणा!
महायुतीचं सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण?; अमित शहांनी अखेर सांगूनच टाकलं
‘माझं आणि हार्दिकचं अजूनही…’; घटस्फोटानंतर नताशाकडून नवा खुलासा