Maharashtra l आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 220 मध्ये सुधारणा करण्याची मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
अल्प भूधारक शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा मिळणार :
दरम्यान, या सुधारणांमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या सुमारे 4 हजार 849 एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे छोट्या आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच याबाबतचे सुधारणा विधेयक मांडण्यास देखील मंजूरी देण्यात आली आहे.
याशिवाय तगाई किंवा तत्सम महसूल न भरल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 220 नुसार अशा जमिनींचा लिलाव होऊन त्या आकारी पड म्हणून शासन जमा करण्यात येत असतात. तसेच अशा जमिनी थकबाकीची देय रक्कम आणि त्यावरील व्याज हे 12 वर्षाच्या आत भरणा केला तर मूळ खातेदारांना परत करण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे आता 12 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर या जमिनी मूळ मालकांना परत करण्याची तरतूद दिली नव्हती.
Maharashtra l ‘त्या’ जमिनी वारसांना परत करणार? :
याशिवाय जमिनी प्रचलित बाजारमूल्याच्या 25% रक्कम वसूल करून मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना परत करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 220 मध्ये करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तसेच विधेयक विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यात येणार असल्याचं म्हंटल आहे.
दरम्यान, महायुतीच्या नव्या सरकारच्या नव्या वर्षातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आकारी पड जमिनींसंदर्भातील सर्वात मोठा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा मिळालेला आहे.
News Title : akari pad land decision to return to original holders
महत्त्वाच्या बातम्या-
लाडकी बहीण योजनेसंदर्भात फडणवीस सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय!
संतोष देशमुख हत्या प्रकरणात ठाकरे गटाने केली सर्वात मोठी मागणी!
अजितदादांच्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराडची गाडी! शरद पवारांच्या नेत्याचा गंभीर आरोप
भुजबळांच्या मंत्रीमंडळ एंट्रीसाठी धनंजय मुंडेंची विकेट?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
छगन भुजबळ भाजपमध्ये कधी प्रवेश करणार? महत्वाची माहिती समोर