नागपूर | मराठा आरक्षणासाठी भाजप आणि शिवसेनेची युती कटिबद्ध असल्याचं वक्तव्य शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे. ते नागपुरातील अधिवेशनात बोलत होते.
सरकार भक्कमपणे न्यायालयात सकारात्मक बाजू मांडत आहे. तत्कालीन आघाडी सरकारने मतांवर डोळा ठेवून मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, युती सरकारने मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत, असं त्यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, मराठा समाजाचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर विश्वास नाही. युतीचं सरकारच मराठा समाजाला न्याय मिळवून देईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-कोण म्हणतं आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही?- सोनिया गांधी
-15 वर्षात पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर
-मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका- धनंजय मुंडे
-यो यो हनी सिंगचा ‘सिंग’ चालतो मग सनीच्या लिओनीचं ‘कौर’ का नाही?
-क्या हुआ तेरा वादा…; धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल