श्रीनगर | पीडीपी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी त्यामागील कारण सांगितलं आहे. मोदी सरकारने निधी दिला, योजना दिल्या, तरीही ‘पीडीपी’ने जम्मू आणि लडाखला पक्षपाती वागणूक दिली, असा आरोप त्यांनी केला.
जम्मू-काश्मीरचा समांतर विकास करायचा. जेवढा खोऱ्याचा होईल तेवढा जम्मू-लडाखचाही विकास करण्याचे ठरले होते. मात्र, पीडीपीने लडाखसोबत नेहमीच पक्षपातीपणा केला, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जम्मू आणि लडाखच्या विकासासाठी केंद्राने दिलेला पैसा तिथं पोहोचलाच नाही. योजनांची आमंलबजावणीही झाली नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-प्लास्टिक बंदीची हुकूमशाही पद्धतीने अंमलबजावणी नको- आव्हाड
-तुमचा ‘शुजात बुखारी’ व्हावा असे वाटते का?; भाजप आमदाराची पत्रकारांना धमकी
-मनसेची ‘मातोश्री’बाहेर पोस्टरबाजी; वाचा नेमकं लिहिलंय काय….
-…म्हणून दाऊदबद्दल भारतीय पुढाऱ्यांची तोंडं बंद; सुब्रमण्यम स्वामींचा गौप्यस्फोट
-भाजप आणि संघाने दुखावलेले प्रवीण तोगडिया आज मोठी घोषणा करणार