मुंबई | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. रश्मी ठाकरे यांना सामनाच्या पहिल्या महिला संपादक होण्याचा मान मिळाला आहे.
रश्मी ठाकरेंची सामनाच्या संपादकपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी रश्मी ठाकरेंचे कौतुक केलं आहे. यानंतर नुकतंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत रश्मी ठाकरेंचे अभिनंदन केलं.
रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. देशातील महिला आणि समाजातील असंख्य समस्यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी देशातील महिलांना उच्चपदावर जाण्याची गरज आहे, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही रश्मी ठाकरेंचे कौतुक केलं आहे.
Congratulations & best wishes to Smt #RashmiThackeray for being appointed as new Editor of #Saamana !Our country needs more women in top leadership positions to represent the issues of women & society & also have a platform to voice their opinions in matters of public importance!
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 1, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
मुंबईत 8 नगरसेवकांचे 60 झाले पाहिजेत… कामाला लागा- अजित पवार
मुख्यमंत्र्यांची आव्हाडांवर स्तुतिसुमनं, म्हणाले…’आता जवळ आल्यावर कळतंय ते कसे आहेत’
महत्वाच्या बातम्या-
“सत्तेचा फेविकॉल इतका पक्का आहे की संध्याकाळी नाराजी दूर होईल”
दिल्लीत हवं तसं घडलं नाही म्हणून भाजपने दंगल भडकवली- शरद पवार
…पण आता ठाकरे सगळंच घेत आहेत- चंद्रकांत पाटील
Comments are closed.