“ठाकरे सरकार म्हणजे खाऊंगा भी और खानेवालो की रक्षा भी करुंगा”
नागपूर | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) अनेकदा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका करताना दिसल्या आहेत. राज्यातील विकास आणि भ्रष्टाचाराबद्दल बोलताना अमृता फडणवीस यांनी आणखी एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राची आज जी परिस्थिती आहे ती ‘खाऊंगा भी, खिलाऊंगा भी और खाने वालों को सुरक्षा भी दूंगा’ अशी आहे, असं म्हणत अमृता फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तर राज्यात प्रगतीचे राजकारण झाले पाहिजे. बाकी तुम्ही खाण्यात काही खा किंवा न खा, त्याने काही फरक पडत नाही, असा टोला देखील अमृता फडणवीसांनी लगावला आहे.
नागरिकांना महाराष्ट्रात विकासाचे राजकारण हवे आहे. भ्रष्टाचार बंद झालाच पाहिजे, असं म्हणत अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तर केंद्रीय तपास यंत्रणा कोणत्याही सूड भावनेने कारवाई करत नाहीत. त्या तपास करतात तेव्हा त्यांच्याकडे पुरावे असताता, असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या.
दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणा निष्पक्ष पद्धतीनेच त्यांचा तपास करतात. त्यामुळे आता आपण बोलून काही उपयोग नाही, असा टोला देखील अमृता फडणवीसांनी लगावला आहे. तर ईडीने (ED) मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर केलेल्या कारवाईवरूनही अमृता फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केली.
थोडक्यात बातम्या-
परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका
“कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याची योजना होती”
नितीन गडकरींच्या घोषणेनंतर पुण्यातील ‘हे’ दोन टोलनाके बंद होणार
“रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत शरद पवारांची भेट घेणार”
विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा पेनड्राईव्ह बॉम्ब, म्हणाले…
Comments are closed.