“…तर सरपंच देशमुखांचे प्राण वाचले असते”; खळबळजनक खुलासा समोर

Santosh Deshmukh Murder

Santosh Deshmukh Murder | बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत रोज नव-नवीन खुलासे होत आहे. या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक झाली आहे. बीडमधील वाल्मिक कराड हा या हत्येमागील मास्टरमाईंड असल्याचा सातत्याने आरोप होत आहे. सध्या कराड हा तुरुंगात आहे. तो पुण्यात स्वतः पोलिसांना शरण आला होता. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील सातत्याने भाष्य करत आहेत. अशात त्यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केलाय. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. (Santosh Deshmukh Murder)

अंजली दमानिया यांचे गंभीर सवाल

त्यांनी या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची प्रत (पोलीस चार्जशीट रिपोर्ट) वाचून काही मुद्द्यांवर बोट ठेवलंय. त्यांनी तपास यंत्रणेला गंभीर सवाल केले आहेत. संतोष देसमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीचा तपास व एसआयटीकडून चौकशी चालू होती. केवळ खंडणीचा आरोपी शोधण्यासाठी हा तपास हाती घेतला नव्हता. असं असूनही नेमक्या कोणत्या गुन्ह्यांखाली वाल्मिक कराडला अटक केली?, सीआयडीकडे खंडणी प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता का?, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय.

पुढे त्या म्हणाल्या की, “मी स्वतः देशमुख हत्या प्रकरणी दाखल गुन्ह्याची प्रत वाचली आहे. त्यामध्ये एका फोनकॉलची माहिती नमूद करण्यात आली आहे. त्यात वाल्मिक कराडचं संभाषण टिपण्यात आलं आहे. यामध्ये कराड आवादाच्या अधिकाऱ्याला धमकावत आहे”, असा खुलासा त्यांनी केलाय. (Santosh Deshmukh Murder)

“…तर संतोष देशमुखांचे प्राण गेले नसते”

“दोन कोटी रुपये द्या अन्यथा बीड जिल्ह्यात तुमचं कोणतंही काम चालू देणार नाही. असं एक व्यक्ती आवादाच्या अधिकाऱ्याशी म्हणतेय. त्यानंतर आवादाच्या एका अधिकाऱ्याचं अपहरण झालं. या अधिकाऱ्याने त्याच्या तक्रारीत म्हटलं आहे की, 28 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता या खंडणीच्या कारणावरून माझं अपहरण झालं. आवादाच्या कर्मचाऱ्याने इतका गंभीर आरोप केला होता. त्याचं अपहरण झालं होतं तरी देखील त्यावेळी त्या प्रकरणातील आरोपींवर कारवाई झाली नाही. तेव्हाच पोलिसांनी कारवाई केली असती तर संतोष देशमुखांचे प्राण गेले नसते”, असं अंजली दमानिया म्हणाल्या. (Santosh Deshmukh Murder)

“मे महिन्यात तक्रार आली होती तर तेव्हाच पोलिसांनी योग्य कारवाई करायला हवी होती. त्यांचं आरोपींशी संगनमत होतं की त्यांच्यावर राजकीय दबाव होता?, सुदर्शन घुले, चाटे व इतर माणसं यामध्ये होती. फक्त वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हे गुन्हे झाले आहेत यात शंका नाही. पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत”, अशी मागणीच दमानिया यांनी केली आहे.

News Title :  Anjali Damania Big Revelation on Santosh Deshmukh Murder

महत्वाच्या बातम्या –

तुम्हालाही कुंभमेळ्याला जायचंय?; पुण्यातून धावणार विशेष ट्रेन, पाहा तिकीट दर

आरोपींना पोलीसच वाचवताय?, ‘त्या’ हत्याप्रकरणी पोलिसांवर गंभीर आरोप

थंडीत पाऊसही लावणार हजेरी, पाहा राज्यात कुठे-कुठे बरसणार?

बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार हॉलतिकीट, अशाप्रकारे करा डाऊनलोड

नवीन कार खरेदी करायचा विचार करताय? तर ही बातमी वाचाच

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .