अनुराग कश्यपने बॉलिवूड इंडस्ट्रीची काढली अक्कल; घेतला सर्वात मोठा निर्णय

Anurag Kashyap

Anurag Kashyap l बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने हल्लीच्या काळातील चित्रपटसृष्टीवर असंतोष व्यक्त करून एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्याने मुंबई सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे, त्यामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

अनुराग कश्यपने बॉलिवूड दिग्दर्शकांवर केली टीका :

अनुराग कश्यपने एका मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीवर जोरदार टीका केली आहे. “हिंदी फिल्म इंडस्ट्रीला काहीच समजत नाही. कारण ते ‘पुष्पा’सारखा चित्रपटसुद्धा बनवू शकत नाही. कारण त्यांच्याकडे तेवढं डोकंच नाही. तसेच चित्रपटनिर्मिती म्हणजे काय, हेच अजूनही त्यांना समजत नाही”, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, “सुकुमारसारखे दिग्दर्शकच ‘पुष्पा’सारखा चित्रपट बनवू शकतात. कारण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत दिग्दर्शकांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते आणि त्यांना चित्रपट बनवण्यास देखील सक्षम केलं जातं. तसेच इथे प्रत्येकजण विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना स्वत:चं विश्व तरी माहितीये का? आणि त्यात त्यांचं अस्तित्त्व सुद्धा किती लहान आहे हे माहितीये का? मात्र हा त्यांचा अहंकार आहे. जेव्हा तुम्ही विश्व निर्माण करता, तेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्हीच देव आहात.” असं अनुराग कश्यप म्हणाले आहेत.

Anurag Kashyap l अनुराग कश्यपने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला :

याशिवाय अनुराग कश्यपने स्टुडिओ मॉडेलवर देखील निशाणा साधला आहे. कारण स्टुडिओ मॉडेलमुळे क्रिएटिव्हीला स्थान मिळत नसल्याची तक्रार अनुरागने बोलून दाखवली आहे. तसेच सध्या मला इथे काही नवीन प्रयोग करायलाच मिळत नाही. कारण इथे पैशांचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच माझे निर्माते आधी नफ्याचा विचार करतात. याशिवाय चित्रपट बनवण्यास सुरुवात होण्यापूर्वीच तो विकला कसा जावा, याचा देखील विचार केला जातोय. यामुळे चित्रपट बनवण्याची मजा निघून जात असल्याचं अनुराग कश्यपने म्हंटल आहे.

अनुराग कश्यपने या सर्व गोष्टींमुळे मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी स्पष्ट देखील केले आहे की, हिंदी चित्रपटसृष्टीतील असंतोषामुळे ते मुंबई सोडण्याचा निर्णय घेत आहेत. कारण आता चित्रपट बनवण्यात उत्साह राहिला नाही आणि त्यामुळे त्यांनी मुंबई सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे.

News Title – Anurag Kashyap Big Statement On Bollywood industry

महत्त्वाच्या बातम्या-

बीडमध्ये घडामोडींना वेग! फरार आरोपींच्या तपासासाठी CID ने उचललं मोठं पाऊल

सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा खळबळजनक खुलासा, भर कार्यक्रमात म्हणाली ‘तो मला खूप…’

मस्साजोगच्या गावकऱ्यांचा अत्यंत धक्कादायक निर्णय, बघून पोलीसही हादरले

सरपंच हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले संदर्भात मोठी अपडेट समोर!

‘इथे सापडला की ठोकला’; वाल्मिक कराड शरण आल्यानंतर वसंत मोरेंचं मोठं वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .