Vidhansabha Result l राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये महायुतीला भरघोस यश मिळाले आहे. मात्र महायुतीच्या या विजयानंतर आता EVM चा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण विधानसभेत पराभूत झालेले उमेदवार आणि काही ज्येष्ठ विधिज्ञ या निकालाच्या विरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. याप्रकरणी अॅड. असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
असीम सरोदे नेमकं काय म्हणाले? :
अॅड असीम सरोदे म्हणाले की, विधानसभेचा निकाल हा अनाकलनीय आणि अविश्वसनीय स्वरूपाचा आहे. कारण एवढे राक्षसी बहुमत महायुतीला जाणे अशक्य आहे. त्यामुळे हे सगळे शंकास्पद वाटत आहे. लोक कोणाला मतदान करतात आणि ते कोणाला मतदान मिळत आहे. या निकालाच्या विरोधात अनेक लोकांनी न्यायालयात जायचे देखील ठरवले आहे.
त्यामुळे पराभूत झालेल्या अनेक दिग्गज उमेदवारांनी मला संपर्क केला आहे. याशिवाय आता काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाचे पराभूत उमेदवार आहे. या सर्वांनी यासंदर्भात याचिका दाखल केली पाहिजे. तसेच उमेदवार नाही तर मतदार देखील या निवडणुकीला चॅलेंज करू शकतो. तसेच यंत्रणांचे शुद्धीकरण आपण न्यायालयात जाऊनच करू शकतो असे अॅड असीम सरोदे यांनी सांगितले आहे.
Vidhansabha Result l मनसे कोर्टात जाणार का? :
मनसेचे नेते दिलीप धोत्रे ईव्हीएमच्या विरोधात हायकोर्टात दाद मागणार असल्याची माहिती मिळत आहे. कारण दिलीप धोत्रे यांनी EVM मशीनमध्ये गडबड झाली असल्याने मतदान कमी झाले असल्याचा थेट आरोप केला आहे. तसेच व्हीव्हीपॅटच्या स्लिपची फेर मोजणी करावी ही मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळल्याने मुंबई उच्च न्यायलायात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
News Title – Asim Sarode is preparing to go to court against the vidhansabha result
महत्त्वाच्या बातम्या-
बच्चू कडूंना पराभवाचा जोरदार धक्का, म्हणाले मी…
मोठी बातमी! औक्षण करताना उडाला भडका, नवनिर्वाचित आमदार जखमी
भाजपने विधानसभेला ‘ती’ चूक टाळली; भाजपच्या यशाचं गुपित समोर
निकालानंतर शिंदे गट अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, कुठं घडली घटना?
निकालाबाबत राऊतांचा अजबच दावा; म्हणाले, “जे घडलं त्याला धनंजय चंद्रचूड..”