Atal Setu Bridge | अटल सेतूचे (Atal Setu Bridge) उद्घाटन होऊन पाच महिन्याचा कालावधी झाला असेल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आलं होतं. याचा पाढा हा भाजपने प्रत्येक प्रचारसभांमध्ये वाचून दाखवला होता. त्यामध्ये अटल सेतूचा देखील उदो उदो करण्यात आला होता. अटल सेतू (Atal Setu Bridge) हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट होता. मात्र आता त्याच ड्रीम प्रोजेक्टला तडा गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
अटल सेतूच्या (Atal Setu Bridge) रस्त्याला भेगा पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचे फोटो आता व्हायरल झाले आहेत. यावर आता काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. भाजपच्या विकासावर बोट ठेवलं आहे. याप्रकरणी मोठा गदारोळ होत असल्याचं लक्षात आलं आहे. त्यावर आता MMRDA ने स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, भाजपने देशातील काही पूल बांधले आहेत. त्यापैकी अटल सेतू हा पूल आहे. मुंबईला केवळ पाऊण तासाचा कालावधी अटल सेतूच्या माध्यमातून लागेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र अटल सेतू (Atal Setu Bridge) प्रकल्पाच्या रस्त्याला भेगा पडल्याने आता काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अटल सेतूची पाहणी केली. यावेळी त्यांनी ट्विट करत भाजपच्या विकासावर बोट केलं आहे.
नाना पटोलेंचं ट्विट जसंच्या तसं
नाना पटोलेंनी ट्विट करत लिहिलं की, “प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीनच महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या “अटल सेतू” पुलास भेगा पडल्याची बाब अतिशय चिंताजनक आहे. मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिहार मध्ये नवनिर्मित पुल कोसळल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सरकारच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीनच महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या “अटल सेतू” पुलास भेगा पडल्याची बाब अतिशय चिंताजनक आहे. मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिहार मध्ये नवनिर्मित पुल कोसळल्याची घटना ताजी असतानाच… pic.twitter.com/NGUrLFinj6
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 21, 2024
“सरकारचा भ्रष्ट कारभार उघड”
काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाचा भाग म्हणून सरकारचा भ्रष्ट कारभार उघड करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांसोबत या पुलाची पाहणी केली. सदर बाब अत्यंत गंभीर असून आदरणीय उच्च न्यायालयाने याची सुमोटो दखल घेऊन चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. यावेळी समवेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते श्री. मदन जाधव, सचिव श्री. रमाकांत म्हात्रे, श्री. रामविजय बुरुंगुळे आदी मान्यवर उपस्थित होते,” असं ट्विट नाना पटोलेंनी केलं.
या मुद्द्यावर आता MMRDA ने स्पष्टीकरण दिलं आहे. MMRDA ने सांगितलं की, अटल सेतूच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून विविध माध्यमांवर अफवा पसरवू नये. अफवांवर विश्वास देखील ठेवू नये. अटल सेतूवर पोहोचणाऱ्या मार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत. चिरा पडलेला भाग हा पुलाचा सर्व्हिस रोड असल्याची माहिती MMRDA ने दिली. पुलाला आलेल्या या भेगा या संरचनात्मक दोषांमुळे नसून त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचं लक्षात घेणं महत्त्वाचं असल्याची माहिती MMRDA ने दिली.
News Title – Atal Setu Bridge Crack News Update
महत्त्वाच्या बातम्या
लक्ष्मण हाकेंनी काढली मनोज जरांगेंची लायकी, म्हणाले…
‘मी त्या जातीतली…’; मराठी सिनेसृष्टीबाबत माधुरी पवारने केला धक्कादायक खुलासा
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी!
हवामान विभागाचा मोठा इशारा ; ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता