मुंबई | राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने अटक केली आहे. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
हे राष्ट्रवादीचे नेते घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवतात, अशी बोचरी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केले आहेत.
नबाब मलिक इतके वाह्यात कसे बोलतात हे लक्षात आलं का, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी नबाब मलिक यांच्यावर निशाणा साधलाय.
दरम्यान, ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक केलेल्या ब्रिटिश नागरिक करण सजनानीशी त्यांचा ड्रग्ज तस्करीतून आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपातून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यापूर्वी या अनुषंगाने त्यांची सुमारे दहा तास सखोल चौकशी करण्यात आली.
नबाब मलिक यांच्या जावयाला अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अटक. हे राष्ट्रवादीचे नेते घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवतात. नबाब मलिक इतके वाह्यात कसे बोलतात हे लक्षात आलं का?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 13, 2021
थोडक्यात बातम्या-
“मुंडे, मलिकांच्या प्रतापावर सामनामध्ये एखादा अग्रलेख पाडा”
जावयाच्या चुकीची शिक्षा सासऱ्याला का व्हावी?- जयंत पाटील
बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंचं ट्विट; कटुतेवर मात करत….
व्हाॅट्सअपला धक्के सुरुच; ‘या’ बड्या कंपन्यांचा बायबाय; सिग्नलला दिली पसंती!
राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो, संजय राऊतांचा भाजपला तिळगूळ!