मुंबई | पुण्यात एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदूंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.
शरजील उस्मानी ठाकरे सरकारचा जावई आहे का?, भाजपने आंदोलन केल्यावर एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र अटक झाली नाही, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
या जिहादी भामट्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला नाही?, मुळात भामट्यांची गर्दी असलेल्या चिथावणीखोर एल्गार परिषदेला परवानगी का दिली?, असा सवालही भातखळकरांनी राज्य सरकारला केला आहे. भातखळकरांआधी इतर भाजप नेत्यांनी शरजील उस्मानीवर टीका केली.
दरम्यान, एक हरामी सर्जील उस्मानी हिंदू समाजावर टीका करतो पण त्याच्यावर फक्त एफआयआर दाखल केला जातो. त्याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे. परत कुठल्या हरमीची हिम्मत होणार नाही हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघायची, असं भाजप नेते निलेश राणे यांनी म्हटलं आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरजील उस्मानी अटक करण्याची मागणी केली आहे.
शरजील उस्मानी ठाकरे सरकारचा जावई आहे का? भाजपाने आंदोलन केल्यावर FIR दाखल करण्यात आला परंतु अटक झाली नाही. या जिहादी भामट्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला नाही? मुळात भामट्यांची गर्दी असलेल्या चिथावणीखोर एल्गार परिषदेला परवानगी का दिली???
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 3, 2021
थोडक्यात बातम्या-
‘उद्या सकाळी शेतात या’, असं व्हॉट्सअ्ॅप स्टेटस ठेवत शेतकऱ्यानी केली आत्महत्या
‘अभिनेत्री वॅाशरुमध्ये असताना…’; पंचतारांकित हॅाटेलमध्ये अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार
‘शरजील नावाच्या कारट्याला अटक होणार नसेल तर…’; नितेश राणे आक्रमक
“हरामी सर्जील उस्मानीला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे”