Maharashtra l विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष हे महापालिका निवडणुकीकडे लागले आहे. अशातच आता महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसे हा पक्ष वेगाने कामाला लागला आहे. कारण नुकतीच मनसेची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे.मात्र या बैठकीमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती होऊ शकली नाही, यासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा झाली आहे.
…म्हणून मनसे आणि भाजपची युती झाली नाही :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मनसे आणि भाजपची युती होऊ शकली नाही अशी खंत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा आणि विधानसभा या मोठ्या निवडणुकीमध्ये जे शक्य झालं नाही ते आगामी काळात शक्य होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय या आगामी काळात मनसे आणि भाजप या पक्षांच्या युतीचे देखील स्पष्ट संकेत मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिले आहेत. यावेळी अविनाश जाधव म्हणाले की, “विधानसभेला आम्ही एकटे लढलो. तीन-तीन पक्ष आमच्या विरोधात देखील लढले. तसेच 30, 40, 70 हजार मतदान मनसेला विधानसभा निवडणुकीला मिळाले होते. मात्र आता आम्ही मिळून भेटलो आहोत”, असं अविनाश जाधव म्हणाले आहेत.
Maharashtra l मनसे आणि भाजपची युती होणार? :
दरम्यान, मनसे आणि भाजप युती झाली तर आम्ही त्याचे स्वागत नक्कीच करू. तसेच आम्ही एकत्र आलो तर त्याचा फायदानक्कीच भाजपला देखील होणार आहे”, असं वक्तव्य अविनाश जाधव यांनी केलं आहे.
याशिवाय “मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रातील एक मोठे नाव आहे. तसेच त्यांना भेटायला अनेकजण नेहमी जात असतात. त्यामुळे भाजप आणि मनसे हे पक्ष एकत्रित आले तर भाजपची ताकद नक्कीच वाढेल. तसेच आमची देखील ताकद वाढेल”, असं देखील अविनाश जाधव म्हणाले आहेत.
News Title – avinash jadhav important reaction about alliance with bjp
महत्त्वाच्या बातम्या –
“… तर सुरेश धस यांना बंदुकी दिसल्या नाहीत का?”; ‘या’ नेत्याचा मोठा दावा
आताची सर्वात मोठी अपडेट!, वाल्मिक कराडविरोधात पोलिसांना सर्वात मोठा पुरावा मिळणार?
मुंबईकरांना भुयारी मेट्रो मार्ग मिळणार!
देशभरातील HMPV च्या रुग्णांचा आकडा समोर!
नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांच्या किंमती जाहीर!