नागपूर | संजय दत्त निरपराध आहे असं बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते, असं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी सांगितलं. ते नागपूरात एका सांस्कृतीक कार्यक्रमात बोलत होते.
मी संजू सिनेमा पाहिला असून खरचं तो खूपच सुंदर सिनेमा आहे. यामध्ये माध्यमे, पोलीस आणि न्यायव्यवस्था यांची मते एखाद्यावर कशा प्रकारे परिणाम करु शकतात हे दाखवण्यात आले आहे, असंही त्यांनी सांगितलं.
पेनची ताकद ही एखाद्या अणू बॉम्बपेक्षाही मोठा विध्वंस घडवून आणू शकते. त्यामुळे माध्यमांनी लिहीताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
महत्त्वाच्या बातम्या–
-विरोधकांनी आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही- विनोद तावडे
-शिक्षक भरतीबद्दल राज्य सरकारची मोठी घोषणा; दोन महिन्यांत 18 हजार शिक्षकांची भरती
-मुख्यमंत्री असतांना पृथ्वीराज चव्हाण झोपले होते का?- अतुल भोसले
-थापा मारून राज्य आणायचं म्हणजेच चाणक्य नीती का? उद्धव ठाकरेंचा सवाल
-भिडेंना वारीत पुढं करून दंगल घडवण्याचा प्रयत्न- प्रकाश आंबेडकर