Bansa Gopal Chowdhury | पश्चिम बंगालचे माजी मंत्री, दोन वेळा खासदार राहिलेले आणि एकेकाळी वर्धमान-आसनसोल औद्योगिक पट्ट्यातील प्रमुख डावे नेते म्हणून ओळखले जाणारे बंसा गोपाल चौधरी (Bansa Gopal Chowdhury) यांची त्यांच्या पक्षातून, अर्थात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून (CPI(M) – Communist Party of India हकालपट्टी करण्यात आली आहे. एका महिला पक्ष कार्यकर्त्याने केलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपानंतर पक्षाच्या अंतर्गत समितीने केलेल्या चौकशीअंती ही कठोर कारवाई करण्यात आली.
पक्षांतर्गत चौकशी आणि कारवाईचे स्वरूप-
सीपीआय(एम) पक्षाच्या नेतृत्वाने पश्चिम वर्धमान (Bansa Gopal Chowdhury) जिल्हा सचिवालय सदस्य आणि पक्षाची कामगार संघटना ‘सीआयटीयू’चे जिल्हा सचिव असलेल्या बंसा गोपाल चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील पक्षाच्या एका महिला नेत्याने चौधरी यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची चौकशी पक्षाच्या अंतर्गत तक्रार समितीने केली आणि समितीच्या शिफारशीनुसार चौधरींना पक्षातून काढून टाकण्यात आले.
तक्रारदार महिला नेत्याच्या आरोपानुसार, चौधरी यांनी तिला सोशल मीडियावरील फेसबुक मेसेंजरद्वारे (Bansa Gopal Chowdhury) अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील संदेश पाठवले. एका संघटनेविषयी माहिती देण्याचे आश्वासन चौधरी यांनी दिले होते, मात्र माहिती न मिळाल्याने तिने आठवण करून दिली असता, चौधरी यांनी तिला हे संदेश पाठवण्यास सुरुवात केली, असे तक्रारीत म्हटले आहे. दुसरीकडे, बंसा गोपाल चौधरी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
बंसा गोपाल चौधरींची राजकीय कारकीर्द-
बंसा गोपाल चौधरी हे १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाले. राणीगंज येथील टीडीबी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे शिक्षण घेत असताना ते सीपीआय(एम)ची विद्यार्थी आघाडी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्य बनले आणि पुढे अविभाजित वर्धमान जिल्ह्याच्या एसएफआय युनिटचे अध्यक्ष झाले. त्यांची पक्षातील प्रगती वेगाने झाली. १९८७ साली पक्षाने त्यांना राणीगंज विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार हराधन रॉय यांच्याऐवजी उमेदवारी दिली आणि ते निवडून आले.
सीआयटीयूचा प्रमुख चेहरा-
पुढे ते आसनसोल दुर्गापूर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष झाले. १९९१ मध्ये ज्योती बसू यांच्या मंत्रिमंडळात व्यावसायिक शिक्षण राज्यमंत्री आणि १९९६ मध्ये तांत्रिक शिक्षण मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली. २००१ ते २००६ या काळात बुद्धदेव भट्टाचार्य सरकारमध्ये त्यांनी लघु आणि कुटीर उद्योग मंत्री म्हणून काम पाहिले.
२००५ च्या आसनसोल लोकसभा पोटनिवडणुकीत आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले. मात्र, २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांनी त्यांचा पराभव केला. एकेकाळी ते वर्धमान-आसनसोल औद्योगिक क्षेत्रातील सीपीआय(एम) आणि सीआयटीयूचा प्रमुख चेहरा मानले जात होते.