मुंबई | माझा मतदारसंघ असलेल्या घाटकोपरमध्ये काही डोंगराळ भाग आहे, त्या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नाहीये, जोपर्यंत तीथे नळाला पाणी येत नाही तोपर्यंत मी माझे केस कापणार नसल्याचं भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी म्हटलं आहे.
जोपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये सर्वांना पाणी मिळत नाही तोपर्यंत मी माझे केस कापणार नाही, अशी प्रतिज्ञाच राम कदम यांनी केली आहे.
जोपर्यंत तीथे नळाला पाणी येणार नाही, तोपर्यंत मी माझे केस कापणार नसल्याचं राम कदम यांनी म्हटलं आहे. मी जे बोलतो ते मी करतो असं देखील राम कदम यांनी म्हटलं आहे.
माझ्या मतदारसंघात काही भाग डोंगराळ आहे. या भागात अनेक दिवसांपासून पाणी नाहीये. मतदारसंघाची लोकसंख्या वाढली, घरांची संख्या वाढली मात्र पाण्याचे प्रमाण वाढले नाही. दुर्दैवानं काही लोकांनी पाण्याचा व्यापार केला, असा आरोप त्यांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या-
- जबरदस्त बेनिफिट्स असलेला जीओचा न्यू इयर प्लॅन लाॅंच
- पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करा, खचून जाऊ नका- राज ठाकरे
- IPL 2023 Auction | ‘हा’ खेळाडू ठरला आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू!
- कंगनानं स्वत:ची तुलना केली थेट लता मंगेशकरांशी
- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारचा मोठा निर्णय