मंत्री आले, पदाधिकारी फिरकलेही नाही!; पालकमंत्री जाहीर होताच महायुतीत नाराजीनाट्य

Mahayuti

Maharashtra | राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊन महायुती सत्तेवर आली आहे. सत्तेवर आल्यानंतरही बऱ्याच दिवसापासून पालकमंत्री नेमण्याचे घोंगडे भिजत पडले होतं. अखेर पालकमंत्री जाहीर झाले आहेत.

पालघरमध्ये येणाऱ्या माजी पालकमंत्री (Former Guardian Minister) रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यासह प्रत्येक भाजप मंत्र्यांचे (BJP Ministers) बॅनरद्वारे (Banner) भरभरून शुभेच्छा (Wishes) देत स्वागत केले जात असल्याचे आजवर दिसून आले आहे. मात्र, शनिवारी (Saturday) वनमंत्री (Forest Minister) गणेश नाईक यांच्या स्वागताला भाजप पदाधिकारी फिरकलेच नाहीत.

नाईक यांच्या स्वागताला भाजप पदाधिकाऱ्यांऐवजी (BJP Office Bearers) राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) जुने सहकारी (Old Colleagues), कार्यकर्ते (Workers) मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांची नाराजी (Displeasure) उघड :

वनमंत्री गणेश नाईक यांच्या स्वागताला भाजप पदाधिकारी गैरहजर राहिल्याने नाराजी उघड झाली आहे. यावरून, भाजप पदाधिकाऱ्यांना गणेश नाईक यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती मान्य नसल्याचे दिसत आहे.

गणेश नाईक नाराज :

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात (Cabinet) स्थान न मिळाल्याने गणेश नाईक नाराज असल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, गणेश नाईक आणि भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

News Title : BJP office bearers absent from Forest Minister Ganesh Naik’s welcome in Palghar

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .