मुंबई | बंदला पाठींबा देणारे सत्ताधारी कॅाग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं शेतकरी प्रेमच मुळात नकली असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अद्याप पुरेशी मदत दिली नसल्याचं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
दुध उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. ना शेतकऱ्यांना कोणती मदत राज्य सरकारने कोरोना काळात केली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात खाजगीकरण सुरू झालं. शरद पवारांचं कृषिमंत्री असताना पाठवलेलं पत्र आज समोर आहे. ज्यात शेतकऱ्यांचा हितासाठी खाजगीकरणाला चालना देण्याबाबत त्यांनी लिहीलं आहे, असंही उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाला राज्यातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठींबा दिला आहे. गेल्या 11 दिवसापासून हे आंदोलन चालू असून दिवसेंदिवस हे आंदोलन पेटत चाललं आहे.
बंदला पाठींबा देणारे सत्ताधारी कॅाग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांच शेतकरी प्रेमच मुळात नकली आहे.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणारे @OfficeofUT मुख्यमंत्री झाले तरी अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अद्याप पुरेशी मदत दिली नाही. दुध उत्पादक —२— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 7, 2020
महत्वाच्या बातम्या-
शेतकऱ्यांचा उद्या ‘हिंदुस्थान बंद’चा इशारा!
सिनेसृष्टीला धक्का! कोरोनामुळे ‘या’ अभिनेत्रीला गमवावा लागला आपला जीव
देशातील जनतेनंही स्वयंस्फुर्तीने शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’मध्ये सहभागी व्हावं- संजय राऊ
राजधीनीतील कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाचे लंडनमध्येही पडसाद
उदय सामंतांनी प्राध्यापकांसाठी केली ही मोठी घोषणा!
डाॅ. शीतल आमटे प्रकरणाचा तपास घातपाताच्या दिशेने?; १६ जण ताब्यात