अहमदनगर | श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीत भाजपची गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे. कारण भाजपला 19 पैकी 11 जागा मिळाल्या आहेत पण नगराध्यपदावर पाणी सोडावं लागलं आहे.
भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. तर आमदार राहुल जगताप यांच्यासाठी हा मोठा विजय मानला जात आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या शुभांगी पोटे यांची नगराध्यक्षपदावर निवड झाली आहे. भाजपच्या सुनिता शिंदे यांना यात पराभव स्वीकारावा लागला आहे.
दरम्यान, हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आहे, असं आमदार राहुल जगताप यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जर कोणी डिवचलं तर त्यांना आम्ही सोडत नाही- नरेंद्र मोदी
–“हिंदू मुलींना स्पर्श करणारे हात मुळापासून तोडून टाका”
-भारतीय संघाची मोठी दहशत; आता न्यूझीलंड पोलिसांनीही घेतली दखल
-भाजपच्या अतुल भोसलेंना काही जमलं नाही; पृथ्वीराज चव्हाणच ठरले किंग…
–महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे आणि राहणार- संजय राऊत