Film Industry l चित्रपटसृष्टीची (Film Industry) राजधानी असलेल्या मुंबईमध्ये (Mumbai) देशभरातून कलाकार येत असतात. त्यांना हे शहर सुरक्षित वाटते. मात्र, असे असले तरी मुंबईत अनेक कलाकारांच्या घरात घुसखोरी (Break-ins) आणि चोरी (Theft) झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. या घटनांमुळे कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Film Industry l पूनम ढिल्लन (Poonam Dhillon) ते अर्पिता खानपर्यंत (Arpita Khan) अनेकांना फटका :
जानेवारी २०२५ : अभिनेत्री पूनम ढिल्लन यांच्या घरी चोरी करणाऱ्याला खार पोलिसांनी (Khar Police) अटक केली. आरोपी समीर अन्सारी (३७) हा अभिनेत्रीच्या घरी रंगकाम करायला आला होता. त्याने चोरलेला सगळा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
जून २०२४ : प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या अंधेरी (Andheri) येथील कार्यालयावर दरोडा टाकून चोरट्यांनी अंदाजे ४.१५ लाख रोख रक्कम व अंदाजे ५० हजारांचा ऐवज लंपास केला. सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे अंबोली पोलिसांनी (Amboli Police) आरोपींना ताब्यात घेतले होते.
मे २०२३ : अभिनेता सलमान खानची (Salman Khan) बहीण अर्पिता खान हिच्या खार येथील घरातून ५ लाख रुपयांचे कानातले चोरी करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी संदीप हेगडे (३०) नामक नोकराला अटक केली होती.
मार्च २०२३ : सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मुंबईतील ‘मन्नत’ (Mannat) या बंगल्यात २० ते २२ वयोगटातील दोन तरुण घुसले होते. त्यांनी किंग खानचे फॅन्स असल्याचे भासवून त्याच्या बंगल्याच्या बाहेरील भिंतीवर चढून आवारात प्रवेश करत तिसऱ्या मजल्यापर्यंत मजल मारली. मात्र, सुरक्षारक्षकांनी (Security Guards) त्यांना पकडून वांद्रे पोलिसांच्या (Bandra Police) ताब्यात दिले.
ऑगस्ट २०१६ : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ‘जलसा’ (Jalsa) या बंगल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी एका २३ वर्षीय व्यक्तीने सुरक्षा व्यवस्था तोडली होती. त्यालाही बच्चन यांच्या सुरक्षारक्षकांनी पकडून नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
दरम्यान, या घटना म्हणजे हिमनगाचे टोक असून, अशा अनेक घटना उघडकीस आल्या नाहीत. या घटनांमुळे मुंबईतील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
News Title: Break-ins at the Residences of Bollywood Stars from Amitabh to Shah Rukh
महत्वाच्या बातम्या-
सैफ अली खान हल्ला प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा समोर!
NEET UG ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी!
एसटीच्या चालक आणि वाहकांसाठी गुडन्यूज, महामंडळानं केली सर्वात मोठी घोषणा
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गात मोठा बदल?, आढळराव पाटलांच्या आरोपांनी खळबळ
‘या’ कर्मचाऱ्यांनाही मिळणार आठवा वेतन आयोग, केंद्र सरकारचा मोठा निर्णय