नवी दिल्ली | आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 चा केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. आज संपूर्ण देशाचं लक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे असल्याचं पहायला मिळालं. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मोठ्या घोषण्या केल्या. अशातच त्यांनी शेतकऱ्यांविषयी मोठी घोषणा केली.
कृषी क्षेत्रानं कोरोना महासाथीच्या काळात चांगली कामगिरी केली. पुढील आर्थिक वर्षात सरकार शेतकऱ्यांना (MSP) एमएसपी अंतर्गत 2.7 लाख कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
2023 हे भरडधान्याचे वर्ष म्हणून घोषित करून रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला चालना दिली जाईल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. शासनाकडून शेतकऱ्यांना डिजिटल सेवा (Digital Service to farmers) देण्यात येणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.
दरम्यान, देशात मोठ्या प्रमाणावर तेलबिया आयात केल्या जातात, तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या –
Budget 2022: ‘इतक्या’ लाख नव्या नोकऱ्या देणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Budget 2022: 1 फेब्रुवारीपासून तुमच्या खिशावर होणार परिणाम, बदलणार ‘या’ गोष्टी
‘पुष्पा असो किंवा फुसका लेकिन झुकेगा नही साला’; भाऊ कदमचा अनोखा अंदाज, पाहा व्हिडीओ
“तुमचं भविष्यच जर बिघडणार असेल तर भाजपला संपवून टाका”
Student Protest: ऐकलं नाही तर पुन्हा ताकद दाखवू, हिंदुस्थानी भाऊचा ठाकरे सरकारला इशारा
Comments are closed.