निलंगा | जिल्ह्यात सर्वधर्मसमभाव जोपासत सामाजिक ऐक्य टिकवणारे टिकवणारे नेतृत्व अशी संभाजीराव पाटील निलंगेकर यांची ओळख आहे. विकासाचा वारसा त्यांनी जोपासला आहे. त्यामुळे 20 तारखेला होणाऱ्या मतदानात वीरशैव समाजाने संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करावी, असे आवाहन माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी केले. निलंगा येथे आयोजित वीरशैव समाजाच्या मेळाव्यात बसवराज पाटील बोलत होते.
यावेळी बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, लातूर जिल्ह्याच्या राजकारणाची राज्यात व देशात वेगळी ओळख आहे. अनेक इतिहास जिल्ह्याने घडवले आहेत. एक केंद्रीय गृहमंत्री व दोन मुख्यमंत्री लातूर जिल्ह्याने दिले. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर व शिवराज पाटील चाकूरकर यांनी सर्वधर्मसमभावाचे विचार दिले. विकासकामेही केली. हाच वारसा माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) हे जोपासत आहेत. त्यामुळे समाजाने त्यांना पाठबळ देण्याची गरज असल्याचेही बसवराज पाटील म्हणाले.
त्यांनी सांगितले की, राजकीय दृष्ट्या विचार करता सध्याची परिस्थिती बिकट आहे. स्वार्थापायी सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वधर्मसमभाव जोपासत सामाजिक ऐक्य टिकवणारा नेता अशी संभाजीराव पाटील निलंगेकर यांची ओळख आहे, असे नेतृत्व जोपासणे, त्याला बळ देणे ही आपली बांधिलकी आहे. त्यामुळे संभाजीराव पाटील (Sambhaji Patil Nilangekar) यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे ते म्हणाले. बसवराज पाटील म्हणाले की, संभाजीराव पाटील यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. प्रत्येक उंबरठ्याचा विकास ही त्यांची संकल्पना अनोखी आहे. अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्याचे वेगळे परिमाण स्थापित केले आहेत. या सर्व बाबींचा विचार करता निलंगा मतदारसंघासाठी संभाजीराव पाटील (Sambhaji Patil Nilangekar) यांचे नेतृत्व ही काळाची गरज असल्याचंही ते म्हणाले.
संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. भविष्यात त्यांना मोठी संधी मिळणार असून त्यामुळे निलंगा मतदारसंघासह लातूर जिल्ह्याचा विकास होणार असल्याचे बसवराज पाटील म्हणाले.
यावेळी बोलताना संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, राजकीय इतिहास घडवण्याची संधी निलंगा मतदारसंघातील जनतेला चालून झाली आहे. निलंगा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात मी काम केले. प्रत्येक जाती-धर्म आणि समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. लिंगायत समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्याने पाठपुरावा करू. निलंगा मतदारसंघात कर्नाटक राज्यात असणाऱ्या पुतळ्याहून आकर्षक असा महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभा करू. लिंगायत समाज दूरदृष्टीचा विचार करतो. त्यांचे विचार वास्तववादी असतात. या समाजाने आज पर्यंत अनेक परिवर्तने घडवली आहेत. आता समाज बांधवांनी निलंगा जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात महायुतीच्या पाठीशी आपले पाठबळ उभे करून राजकीय परिवर्तन घडवण्यास हातभार लावावा, असे आवाहनही निलंगेकर यांनी केले.
संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मागील 20 वर्षात पारदर्शक व प्रभावी नेतृत्व केले आहे. त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले असून त्यामुळेच त्यांना पालकमंत्री पदही देण्यात आले होते. आताही निलंगेकर यांना मोठी संधी असून त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व सहाही मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास बसवराज पाटील मुरुमकर यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या-
“संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वातच निलंग्याचा विकास झाला”
‘लग्नापूर्वी हा अभिनेता करिश्माचा पहिला…’; करीना कपूरकडून सर्वात मोठा खुलासा
अभिषेक-ऐश्वर्या खरंच विभक्त झाले?, अमिताभ बच्चन यांच्या पोस्टने चर्चेला पुन्हा उधाण
“काकींना नातवाचा आत्ता एवढा पुळका का..”; अजित पवारांचा प्रतिभाताई पवारांवर निशाणा
आनंदवार्ता! सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त; काय आहेत सध्या किंमती?