अखेर शरद पवार पहाटेच्या शपथविधीबाबत स्पष्टच बोलले, म्हणाले फडणवीसांनी…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) आणि अजित पवार(Ajit Pawar) यांचा झालेला पहाटेचा शपथविधी आजपर्यंत महाराष्ट्राची जनता विसरू शकली नाही. पहाटेच्या शपथविधीवेळी नेमकं काय घडलं होतं, हे जाणून घेण्यास आजही अनेकांना रस आहे.

त्यातच काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. फडणवीस म्हणाले होते की, पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या(Sharad Pawar) संमतीने झाला होता.

फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. तसेच पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या परस्पर झाला होता, या चर्चांणाही पूर्णविराम मिळाला होता.

फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार काय प्रतिक्रिया देतील, याकडं सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर पवारांनी नुकतीच मोजक्या शब्दांत यावर मीडियासोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीबाबत त्यांनाच विचारायची गरज आहे. फडणवीसांनी इतक्या दिवसांनी हे प्रकरण का काढलं ? असा सवाल करत पवार म्हणाले की, त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देऊन मी त्यांचे महत्त्व वाढवणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-