मुंबई | महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची (Rai) शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काल रात्रीपासून मुंबईत ढगाळ वातावरण असून वातावरणात उष्णता वाढली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांपासून ढगाळ वातावरणासहीत गार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, विदर्भ तसेच पालघर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीये आहे. 7 मार्च रोजी विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळेल तर 8 मार्च रोजी गारपीट होईल अशी शक्यता हवामान खात्याने (Weather Department) वर्तवली आली आहे.
शेतकर्यांनी त्यांच्या पिकाची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावं असंही आवाहन हवामान खात्याने केलं आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. शेतात काढणीला आलेल्या रबी पिकाचं नुकसान झाल्यामुळे तात्काळ पंचनामा करुन सरकारने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
महत्त्वाच्या बातम्या-
- ‘पुन्हा जीभ हासडण्याची भाषा कराल तर…’; ‘या’ नेत्याचं ठाकरेंना उत्तर
- अर्थव्यवस्थेबाबत रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
- ‘आता त्यांचा रोजचा थयथयाट सुरु आहे’; शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
- पुढचे 24 तास महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
- अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार ऐकून थक्क व्हाल?