‘राज ठाकरेंचं भाषण म्हणजे…’; चंद्रकांत पाटलांकडून जाहीर कौतुक
कोल्हापूर | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) गुडीपाडवा मेळावा काल शिवतीर्थावर पार पडला. यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. तर भाजपवर टीका करणं मात्र टाळलं. यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.
महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरील भाषणावरून जोरदार टीका केली. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचं जाहीरपणे कौतुक केलं आहे.
राज ठाकरेंचं भाषण हे सर्वसामान्य हिंदू नागरिकांना आनंद होईल असं झालं आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक केलं आहे. तर मी धर्मांध नाही पण धर्माभिमानी आहे, हा राज ठाकरेंच्या भाषणातील एक शब्द मला खूप आवडला असल्याचं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक करताना चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही वक्तव्य केलं आहे. या निवडणुकीला आम्ही विकासाच्या दिशेने नेत असताना महाविकास आघाडीचे नेते ती पर्सनलवर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही त्यांच्या जाळ्यात फसणार नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“शिवतीर्थावरचा कालचा भोंगा भाजपचा आणि स्क्रिप्टही त्यांचीच”
युक्रेनमधून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर; विकृत अवस्थेत सापडले ‘इतके’ मृतदेह
सर्वसामान्यांना पुन्हा झटका, पेट्रोल-डिझेल महागलं; वाचा ताजे दर
“…म्हणून मी राज ठाकरेंना अधिक गांभीर्याने घेत नाही”
UPA अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed.