Pune | महाराष्ट्रातल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. मतदानपूर्वीचे 48 तास अतिशय महत्त्वाचे आहेत. अशात भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) कोथरूडकरांना आवाहन केलं आहे.
पाच वर्षांत बरंच काही घडलंय. तरी हिंदुत्वाच्या धाग्याने बांधलेली आपली वीण तशीच कायम आहे. हिंदुत्वच आपला श्वास आहे. राज्यात हिंदुत्वाच्या विचारांचे महायुती सरकारच पुन्हा सत्तेवर येण्यासाठी आपण 20 तारखेलाही मतदान करायचंय, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणालेत.
Chandrakant Patil यांचं कोथरूडकरांना आवाहन
अलीकडेच लोकसभेचीही निव़डणूक झाली. त्यातही भाजपाप्रणित एनडीए सरकारच पुन्हा सत्तेवर आलं. देशातल्या मतदारांनी स्थैर्याला, प्रगतीला, विकासाला आणि सर्वसमावेशतेलाच पुन्हा कौल दिला. राज्यातही मतदार याच विचारांतून मतदान करतील, याची मला खात्री आहे. त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार सुज्ञ मतदार निवडून देतील, याबाबत माझ्या मनात तरी काहीच शंका नाही. ही खात्री असण्यामागे बरीच कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आमचं काम आणि त्यात जनतेचाही असलेला सहभाग, असंही त्यांनी म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील सरकारच्या साथीनं आपण कोथरूडमध्ये जणू विकासाची बुलेट ट्रेनच सुरू केली. अल्पावधीतच अनेक कामे मार्गी लागली, कारण तुम्ही कोथरूडकर माझ्या साथीला होता. मग तुमच्या-माझ्या जगण्यातले वीजपुरवठा, पाणीपुरवठा असे प्रश्न बघता बघता सुटले. त्यात राज्यातल्या महायुती सरकारचं पाठबळ महत्त्वाचं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या रुपाने दोन भरभक्कम पाठीराखे आपल्याला मिळाले. मतदारसंघातील महत्त्वाच्या समस्या, प्रश्न मग चुटकीसारखे मार्गी लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातला विकसित भारत कोथरूडमध्ये आणायचा याच ध्येयाने मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यातूनच मग अनेक मोठे प्रकल्प हा हा म्हणता पूर्ण झाले. उदाहरणच द्यायचं तर, चांदणी चौकातला उड्डाणपूल आणि पुण्यातील पहिल्या मेट्रोचं देता येईल. पक्षभेद न पाळता केवळ कोथरूडचा विकास याच हेतूनं काम केलं. त्यात सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले. धार्मिक उपक्रमांना तुम्ही दिलेली साथही कल्पनातीत होती. आज मागे वळून पाहताना हे सगळं आठवून थक्क व्हायला होतं. मनात एकच विचार येतो, हे इतकं सगळं मी कसं करू शकलो असेन? पुढच्याच क्षणी चेहऱ्यावर हास्य पसरतं आणि उत्तर लक्षात येतं… मी तर निमित्तमात्र. हे सगळं शक्य झालं ते फक्त कोथरूडकरांच्या सहभागामुळेच, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
महायुतीलाच कौल द्या- चंद्रकांत पाटील
फक्त इतकंच सांगतो. राज्यात पुन्हा हिंदुत्ववादी, सर्वसमावेशक महायुतीचं सरकारच सत्तेवर येणं गरजेचं आहे. म्हणून, एकच विनंती करतो. मतदान अवश्य करा. कुठल्याही परिस्थितीत मतदान करा आणि महायुतीलाच कौल द्या, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
नवऱ्याकडून छळ झाला सांगताना भाजप उमेदवाराला रडू कोसळले?
मुख्यमंत्र्यांनी 74 कोटीचा घोटाळा केला; कोणी केला आरोप?
“ठाकरे आहात तर ठाकरेंसारखं वागा, दिल्लीचे बूट चाटू..”; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
“मुस्लिमांचे तळवे चाटतायेत, त्यांना खुश केलं जातंय आणि कातडी हिंदूंची सोलली जातेय”
‘मनोज जरांगे राक्षस…’; कालीचरण महाराजांची दातओठ खात सणसणीत टीका