चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ!

मंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 14 तारखेला मोठे पक्ष प्रवेश होणार आहेत. पक्ष प्रवेशाचे मोठे भूकंप राज्यात बसणार आहे. आमचं सरकार (Goverment) बोलायची कढी नाही, तोंडचे वाफे आम्ही काढत नाही, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे.

शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) जोडी धनाजी संताजीची जोडी आहे. दमदार काम करत आहे. सकाळी 7 ते रात्री 1 पर्यंत काम करण्याचे आमचे संस्कार आहेत, असं बावनकुळे म्हणालेत.

ठाकरे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मले त्यांनी आम्हाला सांगू नये. अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मागल्या सरकारपेक्षा आमचं सरकार दुपटीने मदत करेल, असं आश्वासनही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय.

ठाकरे गट प्रत्येक तहसील कार्यालयासमोर जे आंदोलन करणार ते फुसका बार ठरणार आहे. सत्तेत असताना शेतकऱ्यांना काही दिलं नाही आणि आता आंदोलन करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More