‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “नको त्या गोष्टी माझ्या तोंडी..”

Chhagan Bhujbal | ईडीमुळे आम्ही भाजपाशी हातमिळवणी केली, असा खळबळजनक दावा छगजन भुजबळ यांनी केला असल्याचं एका पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे. या दाव्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम असताना या दाव्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. या दाव्यावर आता स्वतः छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“ईडीपासून सुटका करण्यासाठी आम्ही भाजपाबरोबर गेलो, असा आरोप आमच्यावर कायमच होत आला आहे. तसेच महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मला क्लीन चीट मिळाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मला क्लीन चीट मिळाली होती. याबद्दल मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पेढेही दिले होते. आम्ही विकासासाठी भाजपाबरोबर आलो होतो. महायुतीला पाठिंबा देण्यासाठी 54 लोकांनी स्वाक्षरी केल्या होत्या. त्या सर्वांवर काय ईडीची चौकशी सुरू नव्हती.”, अशी प्रतिक्रया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

“..वर मी नक्कीच कारवाई करेन”

“मी ते पुस्तक वाचले नाही. त्यात काय लिहिलेले आहे? हे नंतर पाहीन. आता सध्या माझे लक्ष प्रचारावर आहे. याबाबत आमच्या वकिलांशीही मी चर्चा करेन. निवडणुकीनंतर जे जे चुकीचे आहे, त्यावर मी नक्कीच कारवाई करेन. नको नको त्या गोष्टी माझ्या तोंडी घातल्या गेल्या, याला मी नक्कीच उत्तर देईन.”,असंही भुजबळ म्हणाले आहेत. पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिलं.

पुस्तकात काय दावा करण्यात आला?

“मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या होत्या. मी जर उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. 100 कोटींच्या आरोपांवरून अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. मलाही अशाप्रकारे अडकवण्याचा पुन्हा प्रयत्न सुरु होता. त्यामुळे आपण भाजपसोबत गेलो”, असं भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले असल्याचं पुस्तकात नमूद करण्यात आलंय.

ईडीच्या त्रासामुळे सर्वच जण चिंतेत होते. भाजपशी हातमिळवणी केल्याशिवाय आपली सुटका नाही, असं सगळ्यांनाच वाटत होतं. शरद पवारांना हे सर्व काही समजत होते.पण ते भाजपबरोबर जाण्यास तयार नव्हते. नंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ईडीच्या जाचापासून सर्वांचीच सुटका झाली, असं भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले असल्याचं पुस्तकात लिहिण्यात आलंय.

News Title :  Chhagan Bhujbal Reacting to the claims about him

महत्वाच्या बातम्या –

‘अटक होऊ शकते म्हणून अजित पवारांनाही घाम फुटला होता’; खळबळजनक दावा समोर

मुख्यमंत्र्यांचं शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची टीका

आजपासून राज्यात पंतप्रधानांच्या कधी व कुठे सभा? पाहा संपूर्ण वेळापत्रक

कोथरूडचा सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास- चंद्रकांत पाटील

“ED पासून सुटका व्हावी म्हणून भाजपसोबत..”; छगन भुजबळांचा खळबळजनक गौप्यस्फोट