सातारा | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. ते साताऱ्यात बोलत होते.
लोकपाल, लोकायुक्त, शेतीमालाला हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे.
अण्णांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच लोकायुक्त समिती नियुक्त करण्याच्या मागणीला आम्ही होकार दिला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल आहे.
केंद्र सरकारच्या विषयावर त्यांना केंद्र सरकारच्या कार्यलयातूनही पत्र पाठवण्यात आलंय. त्यामुळे अण्णांनी उपोषण मागे घ्यावं अशी मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
–सरदार पटेलांनी ‘RSS’ विरुद्ध केलेल्या कारवाईची सत्तरी; तरुणांकडून इतिहासाची उजळणी
–मी जगातील सर्वात अभिमानी पती- रणवीर सिंग
–मुख्यमंत्र्यांना ट्रेंडिंगमध्ये आणण्यासाठी आलेल्या काजल, रिया, श्रेया, भावना ट्रोल
–नरेंद्र मोदींनी लोकशाहीची थट्टा चालवलीय- अरविंद केजरीवाल
–मोदींच्या प्रेमापोटी केलं होतं लग्न; आता मात्र तिचं-त्याचं जमेना!