मुंबई | नागपुरात होणाऱ्या पावसाळी अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांवर नक्षली हल्ला होऊ नये, म्हणून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्याच्या संदर्भात पोलिसांना काही दिवसांपूर्वी डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांकडे चिठ्ठी मिळाली होती. यात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर हल्ले करण्याचे सुतोवाच केले होते, त्यामुळे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
येत्या 4 जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशन होणार आहे आणि विदर्भात नक्षलांचे जाळं मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सुरेक्षत वाढ केली असल्याचं सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या –
-सदाभाऊ हा तर छोटा व्हायरस-राजू शेट्टी
-… तरच शिवसेनेबरोबर युती करू- राजू शेट्टी
-शिर्डी संस्थानाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा!
-अभिनेता प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी!
-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का!