भंडारा | भंडारा येथील रुग्णालयात आग लागल्याने दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेवर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडाऱ्यात येऊन पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.
मी आताच पीडित कुटुंबीयांना भेटलो. हात जोडून उभं राहण्याशिवाय मी काहीच करू शकलो नाही. सांत्वन करता येईल असे शब्दच माझ्याकडे नव्हते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भंडारा दुर्घटनेतील कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री भावूक झाले होते.
ही दुर्घटना आम्ही अत्यंत गंभीरपणे घेतली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. मुंबई अग्निशमन दलाचे निवृत्त अधिकारी प्रभात रहांगदळे या चौकशी समितीत असतील. ही दुर्घटना नेमकी कशी घडली हे शोधल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा अपघात अचानक घडला की आणखी कोणती कारणं आहेत, हे तपासलं जाईल. घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भंडारा दुर्घटनेतील दोषींना सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. गेल्या वर्षभर आपण कोरोनाचा सामना करत होतो. त्यामुळे काही गोष्टींकडे डोळेझाक झाली का? याची चौकशी करण्यात येणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
“लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही, सुरक्षेची खरी गरज महिलांसह संपूर्ण जनतेला”
मला सुरक्षेची गरज नाही, मी फिरत राहणार- देवेंद्र फडणवीस
“महाविकास आघाडी सरकारला देवेंद्र फडणवीसांची लोकप्रियता खुपत आहे”
नाशिकमध्ये 13 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, आरोपींमध्ये एका मुलीचाही समावेश
भाजपच्या माजी आमदाराने काढली विद्यार्थिनीची छेड, जमावाने दिला चोप; पाहा व्हिडीओ