“काॅंग्रेसला आमदार विकून उदरनिर्वाह करावा लागतोय”

नवी दिल्ली | एकीकडं काॅंग्रेस(Congress) पक्षाला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडं मात्र आम आदमी पक्ष(Aam Aadmi Party) बळकट होत चालला आहे. नुकतेच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतही(Gujrat Election) आप पक्षाने आपली जादू दाखवली आहे.

गुजरातमधल्या पराभवानंतर राहुल गांधींनी(Rahul Gandhi) प्रतिक्रिया दिली होती की, गुजरातमध्ये आप आले नसते तर काॅंग्रेस भाजपचा पराभव करू शकले असते. गांधींच्या या वक्तव्याला आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान(Bhagwant Mann) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नुकतेच पंजाबमध्ये बोलताना मान म्हणाले आहेत की, राहुल गांधीं किती वेळा गुजरातला आले. पश्चिमेकडं निवडणुका असताना गांधी पूर्वेकडं पायीयात्रा करत होते. त्यामुळं गांधींनी आधी त्यांच्या वेळेत सुधारणा केली पाहीजे.

गुजरातमध्ये काॅंग्रेसनं निवडणूक लढवली नाही. काॅंग्रेस आता चेंज नाही तर एक्सचेंज पक्ष बनला आहे. काॅंग्रेस पक्ष कोमात गेला आहे, तसेच गरीब पक्ष झाला आहे. त्यामुळं काॅंग्रेस आता आमदार विकून उदरनिर्वाह करत आहे, अशी टीका मान यांनी काॅंग्रेस पक्षावर आणि राहुल गांधींवर केली आहे.

दरम्यान, आप पक्षानं राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याची अट पूर्ण केली आहे. त्यामुळं आप दिवसेंदिवस पाय पसरत आहे, हे गुजरात विधानसभेच्या निवडणुकीवरून लक्षात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-