मुंबई | कोरोना सारख्या महाभयंकर संकटाने अनेक लहान उद्योजकांच्या उद्योगाला खीळ बसली, गोरगरिबांना खायला अन्न मिळत नाही, जगावे कसे हा प्रश्न आहे. अशातच मुंबई महानगरातील 10 लाख गरजूंपर्यंत पोहोचण्याचा निर्धार आज मुंबई भाजपने केला. ही मदत करताना अन्न आणि औषध याला सर्वोच्च प्राधान्य द्या, अशी सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
नगरसेवकांनी प्रत्येक वॉर्डात विशेष जबाबदारी घ्यायची आहे. आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात प्रत्येकाला मिळतील, हे त्यांनी सुनिश्चित करायचे आहे. मुंबईत रेल्वेस्थानकालगत किंवा पुलांखाली अनेक लोक राहतात. त्यांची संख्या मोठी आहे. त्याच्यापर्यंत सेवा पोहोचलीच पाहिजे, फडणवीस यांनी सांगितलं आहे.
फडणवीस यांनी आज राज्यातील भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जेथे भाजपा आमदार नाहीत, अशा विधानसभांतील प्रभारींशी संवाद साधला. या संवादातून अनेक जिल्ह्यांमध्ये अन्य ठिकाणांचे लोक अडकले आहेत, हा एक मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला. देशात सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने त्यांची आहे तेथेच सेवा करा, असं आवाहन फडणवीस यांनी केलं.
दरम्यान, भाजपतर्फे अनेक उपक्रम ठिकठिकाणी हाती घेण्यात आले आहेत. घरपोच औषधी, रक्तदानाच्या उपक्रमात सहभाग, जिल्ह्यांच्या स्वतंत्र हेल्पलाईन, मास्क वितरण असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
Team @bjp4mumbai working hard for every needy!
Interacted with all Mumbai Pradesh District Presidents, Mandal Presidents & BJP Corporators to review various initiatives for the poor & needy in & around Mumbai.
Target set to reach 10,00,000 people in Mumbai alone. #FeedTheNeedy pic.twitter.com/LCo78Ud7fF— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 28, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
नागरिकांना पैशाची उणिव भासणार नाही- सीतारामन
आई-वडीलांना मरण्यासाठी सोडू शकत नाही; अक्षय कुमारकडून 25 कोटींची मदत
महत्वाच्या बातम्या-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ तारखेपासून होणार प्रक्षेपणॉ
सॅल्यूट… आभाळाएवढं मन असणाऱ्या टाटांची आणखी 1 हजार कोटींची मदत!
Comments are closed.