“2019 ला बेईमानी झाली, खूप त्रास… “; तिसऱ्यांदा CM होणाऱ्या फडणवीसांच्या मनातील खदखद समोर

Devendra Fadnavis talk about 2019 incident 

Devendra Fadnavis | 23 नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. निकाल लागून आता जवळपास 11 दिवस उलटले आहेत. अखेर 11 दिवसांनी महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय लागलाय. विधानसभेत भाजपला सर्वाधिक जागांवर यश मिळालय. त्यामुळे मुख्यमंत्री देखील भाजपचाच होणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव हे आघाडीवर होतं. अखेर फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार आहेत. (Devendra Fadnavis) 

देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

आज 4 नोव्हेंबर रोजी मुंबईत भाजपच्या विधीमंडळ नेत्यांच्या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. भाजपचे निरीक्षक म्हणून आलेले विजय रूपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्लमा सीतारमण यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.

गटनेते पदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचं आभार मानलं. तसेच तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची संधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानले. यावेळी फडणवीस यांनी 2019 मध्ये घडलेल्या घडामोडींचा देखील उल्लेख करत मनातील खदखद बोलून दाखवली. 2019 मध्ये बेईमानी झाली. अडीच वर्ष प्रचंड त्रास देण्यात आला, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

2019 मध्ये मतदार राजांनी आपल्याला कौल दिला होता. पण दुर्दैवाने जनतेचा हक्क हिसकावून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी झाली. मी त्या काळात त्या इतिहासात जाऊ इच्छित नाही. पण 2019 मध्ये आलेल्या त्या बेईमानी सरकारने अडीच वर्ष प्रचंड त्रास दिला. आमदारांना, नेत्यांना त्रास दिला. पण या परिस्थितीतही अडीच वर्षात एकही आमदार मला सोडून गेला नाही. याचा मला अभिमान आहे. सगळे आमदार संघर्ष करत होते. त्या संघर्षामुळे 2022 मध्ये आपलं सरकार आलं आणि आता पुन्हा महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

दरम्यान,  देवेंद्र फडणवीस हे महायुती सरकारमध्ये उद्या 5 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा, जेपी नड्डा तसेच अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच महाविकास आघाडी मधील नेत्यांना देखील शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे.

News Title – Devendra Fadnavis talk about 2019 incident 

महत्त्वाच्या बातम्या : 

ते पुन्हा आले….; देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

SBI बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, पगारही मिळणार भरभक्कम; ‘इथे’ करा अर्ज! 

विधीमंडळ गटनेतेपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

अखेर ठरलंं! भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय

आता केवळ ‘या’ पात्र महिलांनाच मिळणार लाडक्या बहिण योजनेचा लाभ; काय आहेत अटी?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .