महाराष्ट्रात येणारं भाजप सरकार पुढील 25 वर्षे चालेल- देवेंद्र फडणवीस
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे (Uddhav Thackeray Resigns). शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि 10 दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आज अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे आमदार एकमेकांना पेढे भरवत होते. चंद्रकांत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना पेढे भरवत असल्याचं पाहायला मिळालं.
यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संबाद साधला. सरकार स्थापनेबद्दल ते काही बोलले नाही. उद्या बहुमत चाचणी होणार आहे. यानंतर आम्ही बसू आणि निर्णय घेऊ असं म्हटलं.
भाजपच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षांत सत्तेवर येणारे सरकार पुढील 25 वर्षे चालेल, असं प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना मार्गदर्शन करताना केलं आहे.
अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची एकनाथ शिंदे यांच्या गटांने हिंमत केली. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. येत्या अडीच वर्षांत महाराष्ट्रातील प्रश्नांना न्याय द्यायचा आहे, असंही ते म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
महाराष्ट्रात येणारं भाजप सरकार पुढील 25 वर्षे चालेल- देवेंद्र फडणवीस
सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
मोठी बातमी! बहुमत चाचणी होणार, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांविषयी शनिवारी मार्गदर्शन सत्र, वाचा सविस्तर
सर्वात मोठी बातमी! औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर
Comments are closed.