मुंबई | पहाटेच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
टीव्ही-9 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी शपथविधीसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
निवडणुकीच्या कार्यक्रमात मोदीजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते. पण ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही, असं फडणवीसांनी सांगितलं.
आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली, की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवंय, म्हणून आपण सरकार तयार करूया. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, तेव्हा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. जी चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. ती काही खाली झालेली चर्चा नाही, असं त्यांनी सांगितलं.
शरद पवारांशी चर्चा झाली त्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे, त्यामुळे त्याठिकाणीही आमच्यासोबत विश्वासघातच झाला. पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो, कारण तो आपल्यासोबतच्या व्यक्तीने केला होता. हा छोटा होता, असं दवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
- पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!
- ‘या’ जोडप्यांसाठी गुडन्यूज; सरकार देणार अडीच लाख
- अदानींना धक्यावर धक्के; अखेर घेतला मोठा निर्णय
- पोहण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?
- Kiss करण्याचे असेही फायदे; वाचून विश्वास बसणार नाही