पुणे | सताधाऱ्यांनी आता जे काही करायचे आहे, ते वर्षभर करा त्यानंतर हे खपवून घेतलं जाणार नाही, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते पुण्यात बोलत होते.
राज्यात भाजपाची सत्ता येऊन चार वर्ष झाले. या काळात सरकारकडून विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराला खतपाणी घातले गेले, त्यामुळे वर्षभर काय करायचंय ते करून त्यानंतर ‘चुन चुनके… अशी फिल्मी डायलाॅगबाजी करत त्यांनी भाजपला इशारा दिला.
दरम्यान, ज्या नागरिकांनी मतदानाच्या माध्यमातून भाजपाला सत्तेमध्ये बसविले तेच यांना आता खाली खेचतील, असंही ते यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
-अटलजींच्या श्रद्धांजली सभेत गडकरींनी कार्यकर्त्यांचे कान उपटले
-मराठा आरक्षणासाठी आमदार, खासदार आक्रमक; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
-मुख्यमंत्र्यांना जमत नसेल तर त्यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा- सुप्रिया सुळे
-पूजा घालायच्या असतील तर त्या स्वत:च्या घरी घाला- सुप्रिया सुळे
-… तर उद्या रामदास आठवलेंही आपल्याशी युती करणार नाहीत- महादेव जानकर