‘…तर राजीनामा द्यायला तयार आहे’; भरत गोगावलेंचा तटकरेंना इशारा

Raigad

Guardian Minister of Raigad l रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या (Guardian Minister of Raigad) मुद्द्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या नावाची पालकमंत्री म्हणून घोषणा केली. मात्र, या निर्णयावरून शिवसेना (शिंदे गट) नेते मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी नाराजी व्यक्त करत तटकरे कुटुंबावर जोरदार टीका केली आहे.

आदिती तटकरे यांनी प्रजासत्ताक दिनी रायगड येथे झेंडावंदन केले, मात्र या निर्णयाने शिंदे गटाच्या नाराजीनाट्याला तोंड फुटले. गोगावले आणि दळवी यांनी सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप करत त्यांच्या ‘राजकीय जादू’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भरत गोगावले यांचा स्पष्ट इशारा :

मंत्री भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांच्या झेंडावंदनावर प्रतिक्रिया देताना, “मंत्री म्हणून त्यांनी झेंडावंदन केलं, त्यावर आमचं काही म्हणणं नाही. पण जर मी काही चुकीचं काम केलं असेल तर राजीनामा द्यायला तयार आहे,” असे विधान केले. गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधत म्हटलं, “जो भावाचा नाही झाला, तो आमचा काय होणार?”

गोगावले यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त करण्याचे सूतोवाच केले. “आम्ही काही गोष्टी गनिमी काव्याच्या पद्धतीने हाताळणार आहोत,” असे सांगत त्यांनी शिंदे गटाच्या पुढील रणनीतीवर संकेत दिले.

महेंद्र दळवींची तटकरे कुटुंबावर टीका :

आमदार महेंद्र दळवी यांनी आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला. “महाविकास आघाडीच्या (MVA) काळात आदिती तटकरे पालकमंत्री होत्या, आणि त्यांच्या कामामुळे वैतागून आम्ही उठाव केला. त्यानंतर गुवाहाटीचं लोण संपूर्ण राज्यात पसरलं आणि सत्ता बदल झाला,” असं दळवी म्हणाले.

दळवी यांनी पुढे सुनील तटकरे यांची ‘राजकीय जादू’ उघड करत म्हटलं, “महायुतीच्या सरकारमध्ये मागच्या दाराने त्यांनी एन्ट्री घेतली आणि मुलीला मंत्री बनवलं. आता पुन्हा दुसऱ्यांदा त्यांच्या जादूने मुलीला पालकमंत्रिपद मिळालं. आम्ही भरत गोगावले यांचं नाव फायनल केलं होतं, पण ते रातोरात बदललं कसं?” असा सवाल त्यांनी केला.

शिंदे गटाची नाराजी महत्त्वाची :

रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या या वादामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. शिंदे गटाचे नेते भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांनी उघड नाराजी व्यक्त करत तटकरे कुटुंबावर थेट टीका केली आहे. यामुळे पुढील राजकीय समीकरणांवर राज्यभर लक्ष केंद्रित झाले आहे.

News Title: Dispute Over Raigad Guardian Minister Post; Bharat Gogawale Slams Tatkare Family

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .