जळगाव | राजकारणात खुनशी वृत्ती वाढीस लागली असून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, अशी खंत भाजप नेते एकनाख खडसे यांनी व्यक्त केली आहे. चाळीसगाव येथील पिंपरी तांडा येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
राजकारणात एक काळ असा होता की शेवटच्या श्वासापर्यंत निष्ठा ठेवणाऱ्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्षात समावेश होता. पण आता निष्ठा लोप पावत चालली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
काहींना उकिरड्यावरुन राजकारणात आणले. पण ते उपकार विसरुन गेले आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
जिल्ह्यात 20 ते 25 वर्षात अनेकांना राजकारणात उभं केलं. पण आता ते एकनिष्ठ राहतील का नाहीत हे सांगता येत नाही, असं त्यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या-
–‘बाद’ फलंदाज पुन्हा मैदानात, क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं!
-प्रकाश आंबेडकरांनी सत्तेचे स्वप्न पाहू नये- रामदास आठवले
–राहुल गांधीच्या जीवनावर आधारित ‘माय नेम इज रागा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
–हजारो प्रेक्षकांसमोर तिनं असं काही विचारलं की पांड्या लाजला!
-प्रकाश आंबेडकरांनी सत्तेचे स्वप्न पाहू नये- रामदास आठवले