Eknath Shinde | राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जनतेच्या समोर आला आहे. महाराष्ट्रात महायुतीने पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. महायुतीने 221 पेक्षा जास्त ठिकाणी आघाडी घेतली असून एकट्या भाजपला 131 ठिकाणी आघाडी मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात महायुतीचे नेते, मंत्री तसेच कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष करत असल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे, ज्याची सगळीकडे एकच चर्चा रंगलीये.
मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया-
विधानसभेच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना मी धन्यवाद देतो. राज्यात महायुतीला लँडस्लाईड व्हिक्टरी अशा प्रकारचा विजय मिळाला आहे. यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो’, पुढे एकनाथ शिंदे असेही म्हणाले, लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी, समाजातील प्रत्येक घटकाने भरभरून मतदान केलं.
जनतेचे आभार-
एवढंच नाही तर, गेली दोन-अडीच वर्षे महायुतीने जे काम केलं, त्याची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आहे. जनतेचे पुन्हा आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो अशा शब्दांत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जनतेचे आभार मानले. तर मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना शिंदे म्हणाले, ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही सगळे एकत्र बसून निर्णय घेऊ, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं.
लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला विजयी केल्याचे दिसून येत आहे. कारण महायुती सरकारला सर्वाधिक 216 जागांवर आतापर्यंत विजय मिळवता आला. असून पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुती सरकारच येणार असं एकूण निकालावरून दिसत आहे. याशिवाय भाजपला सर्वाधिक मतं देऊन राज्यातील भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरताना दिसतो आहे.
News Title : Eknath Shinde gives big statement about cm
महत्त्वाच्या बातम्या-
मविआचे बडे नेतेही ठरले फेल, पाहा पराभूत उमेदवारांची यादी
“संध्याकाळी मी येतो…”, विजयानंतर फडणवीसांना आला ‘त्या’ खास व्यक्तीचा फोन
सर्वात मोठी बातमी! बच्चू कडू यांचा दारुण पराभव
शरद पवारांना धक्का, कागलमधून हसन मुश्रीफ यांनी उधळला विजयी गुलाल
परळीत धनंजय मुंडेंचीच हवा; धनंजय मुंडेंच्या विजयानंतर जल्लोष