नवी दिल्ली | नविन कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या महिन्याभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. तरी देखील सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नसल्यानं शेतकरी अतिशय आक्रमक झाले असून, शेतकऱ्यांनी मोबाईल टॉवर उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे.
गेल्या 24 तासात शेतकऱ्यांनी 176 मोबाईल टॉवरचं नुकसान केलंय. आतापर्यंत शेतकऱ्यांनी उद्धवस्त केलेल्या टॉवरची संख्या 1411 वर पोहचली आहे.
रविवारी 27 डिसेंबर रोजी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी शेतकऱ्यांनी मोबाईल टॉवर उद्ध्वस्त करु नये, असं आवाहन केलं होतं.
दरम्यान, शेतकऱ्यांची ही कृती पंजाब हिताच्या विरोधी असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“ईडीची नोटीस येणं स्वस्त झालंय, आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातात”
कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय- संजय राऊत
रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बोठेच्या अडचणी वाढल्या!
मूठभर बिल्डरांच्या फायद्याचा प्रस्ताव मागे घ्या- देवेंद्र फडणवीस
हे काय पंतप्रधानपद आहे का?; पी चिदंबरम यांनी उडवली शरद पवारांची खिल्ली