पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर!

farmer

PM Kisan Samman Yojana | पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणे आता पूर्वीपेक्षा अधिक किचकट झाले आहे. पात्र लाभार्थ्यांची संख्या ९६ लाख ६७ हजार असली तरी, निकषांची पूर्तता न करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. शेतकऱ्यांना (Farmers) विविध अटींची पूर्तता करावी लागत असल्याने या प्रक्रियेत अनेक अडथळे येत आहेत. (PM Kisan Samman Yojana)

नवीन नियमांनुसार, राज्यातील ९२ लाख ४२ हजार शेतकरी १९व्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत. परंतु, उर्वरित शेतकरी विविध कारणांमुळे अपात्र ठरले आहेत. एकूण पात्र लाभार्थ्यांपैकी ९५ लाख ९५ हजार शेतकऱ्यांनी आपल्या भूमी अभिलेख (Land Records) नोंदी अद्ययावत केल्या आहेत, याचा अर्थ अद्यापही ७८ हजार शेतकऱ्यांच्या नोंदी अद्ययावत झालेल्या नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लवकरात लवकर आपल्या भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

लाभ घेण्यासाठीच्या अटी

भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे
आधार जोडणी (Aadhaar Linking)
ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे
बँक खात्याशी (Bank Account) आधार संलग्न करणे

आधार जोडणी बंधनकारक

राज्य सरकारच्या अॅग्रीस्टॅक (AgriStack) योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना आधार जोडणी आणि शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) प्रदान करण्यात येणार आहे. या अंतर्गत, पीएम किसान सन्मान योजनेच्या २०व्या हप्त्यापासून कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार क्रमांक जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील पती-पत्नी तसेच कुटुंबातील १८ वर्षांखालील सदस्यांची आधार नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे. (PM Kisan Samman Yojana)

ई-केवायसी आणि बँक खात्याशी आधार संलग्नता

आतापर्यंत ९५ लाख १६ हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केले आहे, तर १ लाख ८९ हजार शेतकऱ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तसेच, ९४ लाख ५५ हजार लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधारशी संलग्न केले आहे, तर अद्याप १ लाख ९८ हजार शेतकऱ्यांनी ही अट पूर्ण केलेली नाही. याशिवाय, सुमारे ३६ हजार शेतकऱ्यांनी अर्जाला स्वयंमान्यता दिलेली नाही.

जमीन खरेदीबाबतचे निकष

ज्या लाभार्थ्यांच्या नावावर २०१९ पूर्वी जमिनीची नोंद आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. २०१९ नंतर जमीन खरेदी, खातेफोड किंवा बक्षीसपत्र असल्यास त्यास लाभ मिळणार नाही. १ फेब्रुवारी २०१९ नंतर लाभार्थीच्या नावावर वारसा हक्काने जमीन नोंद झाली असल्यास त्याला लाभ मिळेल. तसेच, कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी यापैकी फक्त एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. आयकर (Income Tax) भरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. (PM Kisan Samman Yojana)

Title :  Farmers need to fulfill all criteria to get benefits of PM Kisan Samman Yojana
महत्वाच्या बातम्या- 

Elon Musk देणार नोकरी, डिग्रीचीही गरज नाही, इथे करा अर्ज

…तर संतोष देशमुख वाचले असते, CID च्या तपासातून धक्कादायक खुलासा

सैफ अली खानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली अत्यंत धक्कादायक माहिती!

गुगलवर चुकूनही सर्च करू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा खावी लागेल जेलची हवा

सैफला चाकूने का मारलं?, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .