अहमदनगर | आमच्या शेतकऱ्यांच्या बायका रास्त्यावर पडल्या आहेत काय?, असा प्रश्न विचारत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे बोलत होते.
भाजपच्या राज्यात बँक अधिकाऱ्यांना माज आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बायकोकडे वाकड्या नजरेनं बघितलं असतं, तर दोन दिवसात जामीन दिला असता का?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
दरम्यान, बुलडाण्यात पीक कर्जासाठी बँक अधिकाऱ्यांने शेतकऱ्याच्या पत्नीला शरिरसुखाची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने त्याला एक दिवसाची कोठडी दिली होती. या अधिकाऱ्याला एका दिवसात जामिन मिळाल्याने राजू शेट्टींनी संताप व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-परक्यांना जवळ करताय?, आम्ही काही पक्ष बदलणारे लोक नाहीत!
-भाजपनं सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेतला!
-भाजप राम मंदिर बांधणार पण अयोध्येत नव्हे, मध्य प्रदेशमध्ये….
-नाणार प्रकल्प महाराष्ट्रात होणं हे भाग्याचं- मुख्यमंत्री
-प्लास्टिक बंदीसाठी आलेल्या अधिकाऱ्याला शिवसैनिकानेच धमकावलं!