फ्लोरिडा | वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी- ट्वेन्टी सामन्यात भारताने 4 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्याच्या टी- ट्वेन्टी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर वेस्ट इंडिजचा संघ 95 धावा करु शकला. वेस्ट इंडिजने दिलेल्या 96 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरवात खराब झाली. मात्र भारताने 6 गडी गमावत विजय मिळवला.
भारताकडून सर्वाधिक 22 धावा रोहित शर्माने केल्या. नवदीप सैनीने सर्वाधिक 3 बळी, भुवनेश्वर कुमारने 2 बळी तर खलिल अहमद, कृणाल पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले.
दरम्यान, वेस्ट इंडिज कडून पोलार्डने आपली अनुभवी खेळी करत संघाला 95 धावांचा टप्पा गाठून दिला. पोलार्डने 49 धावांची खेळी केली .
महत्वाच्या बातम्या-
-“मुख्यमंत्र्याचं ‘हे’ आव्हान मी स्वीकारलं”
-सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना मतदारांनी जोड्यानं मारलं पाहिजे- बच्चू कडू
-घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानला मोठा दणका; 5 ते 7 जणांचा खात्मा
-“शेतकरी आत्महत्या प्रकरणी चौकशीची मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार”
-…म्हणून राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आऊटगोईंग- रामदास आठवले
Comments are closed.